Bammu bhagu phonde
- Home
- Bammu bhagu phonde
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bammu bhagu phonde, Tourist Information Center, .
07/01/2021
काळी नदीचे पाणी वळविण्याप्रकरणी दहा जणांना नोटीस
रामनगरला प्रथम पाणीपुरवठा करण्याची मागणी
02/01/2021
25/12/2020
रामनगरचा पाणी प्रश्न पेटणार का?
काळी नदीतील पाणी पुरवठा योजना मार्गी लागणार का?
11/12/2020
रामनगर-धारवाड मार्गावर अपघात: दोन युवकांचा मृत्यू
19/12/2019
MoEF Min Javadekar had assured Karnataka people before elections that Kalasa Banduri project is approved, now he has taken U-turn, it was an
11/11/2019
park Joida
09/11/2019
06/11/2019
जोयड्यासाठी न्यायालय द्या अन्यथा ४ डिसेंबरला तालुका बंद
काळी ब्रिगेडसह अनेक सामाजिक संस्थांचा इशारा; महिनाभराची मुदत
live
स्वातंत्र्याची ७० वर्षे संपली तरी जोयडा तालुक्याला अद्याप सिव्हिल न्यायालय दिलेले नाही. न्यायालय नसल्याने येथील नागरिकांची फरफट सुरू आहे. त्यामुळे सरकारने महिनाभरात जोयडा तालुक्यासाठी न्यायालय मंजूर करावे, अन्यथा ४ डिसेंबर रोजी संपूर्ण जोयडा तालुका बंद ठेवण्याचा इशारा काळी ब्रिगेड संस्थेसह तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थांनी दिला आहे.
या संदर्भातील निवेदन विविध संस्थांनी तहसीलदार संजय कांबळे यांना दिले. त्यावेळी काळी ब्रिगेडचे संचालक रवी रेडकर, सतीश नाईक, प्रभाकर नाईक, गोकुलदास नाईक, देविदास गावडा, प्रभाकर देसाई, विश्वनाथ नाईक, प्रकाश हरिजन, संदीप, परशुराम व अन्य उपस्थित होते.
काही महिन्यांपूर्वी काळी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांच्यामार्फत उच्च न्यायालय कर्नाटकच्या रजिस्टर ऑफ जनरलला पत्र करून जोयडा येथे न्यायालय हवे असल्याची मागणी केली होती. मैसूर सिव्हिल कोर्ट कायदा १९६४ नुसार प्रत्येक तालुक्यात सिव्हिल न्यायालय, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा न्यायालय व्हायला हवे. १९६४ मध्ये न्यायालयाने केलेल्या निर्देशानुसार प्रत्येक तालुक्यात न्यायालय असणे आवश्यक होते. मात्र जोयडा तालुक्यात न्यायालय झालेले नाही. परिणामी जोयडा वासियांना न्यायहक्कांच्या लढाईसाठी दांडेली, हळीयाळ येथील सिव्हिल न्यायालयात धाव घ्यावी लागते. त्यासाठी अनेक हेलपाटे नागरिकांना मारावे लागत असल्याने त्यांची फरफट सुरू आहे. असे यावेळी रवी रेडकर यांनी सांगितले.
जोयडा वासियांची फरफट थांबावी अन त्यांना हक्काचे न्यायालय मिळावे यासाठी आमचा प्रयत्न असून त्यासाठी महिनाभरात सरकारने निर्णय घ्यावा. असे रवी रेडकर यांनी सांगितले.
15/10/2019
माफियाराज सुसाट, अधिकारी मालामाल, पर्यावरण कोमात
जोयडा तालुक्यातील स्थिती: कोटी कोटींच्या भानगडी
जोयडा: बम्मू फोंडे
निसर्ग संपत्तीने ओतप्रोत भरून राहिलेल्या जोयडा तालुक्यात वर्षानुवर्षापासून निसर्ग संपत्तीची लयलूट सुरू आहे. वाळू, खडी, दगड, लाकूड, वन्यप्राण्यांचे अवयव, मातीची राजरोज तस्करी केली जाते. त्यासाठी नदी नाले, डोंगर,जमीन तसेच जंगले लुटली जातात. प्रत्येक क्षेत्रात माफिया राज सुसाट बोकाळले आहे. माफियांना प्रशासकीय अधिकारी, समाजसेवकांची झुल पांघरूण पांघरूण वावरणारे नेते, लोकप्रतिनिधी, दलालांचा वरदस्त लाभला आहे.
दरवर्षी कोट्यवधिंच्या निसर्गसांपत्ती लूट होत असली तरी त्याविरोधात होणारी कारवाई ही तकलादू आहे. त्यातुन तालुक्यात कोटीकोटींच्या या भानगडी चालत असून माफियाराज सुसाट, अधिकारी मालामाल होत असताना पर्यावरण कोमात जाते आहे. मात्र या भानगडी चालतात कशा असा प्रश्न सामान्यांना पडलेला असून त्यावर टाकलेला हा फोकस....
जोयडा तालुक्यावर निसर्गाने ओंजळ भरून आविष्कार केला आहे. नदी नाले, जंगल, डोंगर दऱ्या खोऱ्यात खनिजांच्या खाणींची मुबलकता आहे. या निसर्ग संपत्तीवर घाला घालून बेकायदा वाळू उपसा, खडी मशीन, झाडांची तस्करी, डोंगरावरील दगडांची आणि वनस्पतींची लूट करणाऱ्या टोळ्याचं जणू कार्यरत आहेत. त्यामध्ये कोट्यावधींचा घपला होत आहे. निसर्ग संपत्ती ही सरकारी मालमत्ता आहे. त्याची लूट तर होतच आहेच शिवाय कोट्यावधींचा महसूल बुडत आहे. नियम धाब्यावर बसवून केल्या जाणाऱ्या या बेकायदा धंद्यांमुळे तालुक्यातील समाजकारण, राजकारण, अर्थकारण बिघडले आहे.
वाळूमध्ये कोटींच्या भानगडी...
तालुक्यात २०१२ पासून वाळू उपसा करण्यास निर्बंध घातले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वाळू उपसा आणि वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नदीनाल्यासह शेत जमिनीत होणारा वाळू उपसा थांबविण्यासाठी फक्त कागदीघोडे चालविले जात आहेत. या व्यवसायातून हप्तेखोरीतून दर महिना सुमारे दोन कोटी रुपयांचा घोटाळा होतो. या व्यवसायावर सरकारचे नियंत्रण अजिबात नाही. व्यावसायिकांनी पैशाच्या जोरावर प्रशासनावरील आपली पकड घट्ट केली आहे. आता हे व्यावसायिक प्रशासनाला हे डोईजड झाल्याचे पहावयास मिळत आहे.
खडीमशिन : लुटीचा वेगळा मार्ग
तालुक्यात खडी मशीनचा (स्टोनक्रशर) व्यवसाय जोरात सुरू आहे. त्यातुन सरकारला काहीसा महसूल मिळत असला तरी त्यात काळाबाजार किती कोटींचा असावा याची प्रचीती येत नाही. या व्यवसायातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार वाळू व्यवसाया सारखीच लूट होते. नियम आणि अटी धाब्यावर बसवून हा व्यवसाय अनेक ठिकाणी बिनदिक्कत चालला आहे. खनिज आणि भूगर्भ खात्याने अनेकवेळा बेकायदा खडी मशीनवर कारवाई केली पण त्याचा परिणाम त्यांच्यावर काहीच झाला नाही. या व्यवसायातही हप्तेखोरी रुजली आहे.
वनसंपतीवर काळी नजर...
वनसंपत्तीने समृद्ध असलेला जोयडा तालुका आज अनेक संकटात सापडला आहे. झाडांची कत्तल ही नेहमीची बाब बनली आहे. तालुक्यात औषधी वनस्पती, चंदन व इतर वनस्पतींची तस्करी केली जाते. त्यावर नियंत्रण आणल्यास वनखात्याला वारंवार अपयश आले आहे. दुर्मिळ पशु पक्षांच्या शिकारी करून त्यांचे अवयव जागतिक बाजारात विकले जाण्याचे प्रकार अनेकवेळा उघडकीस आले आहेत. या व्यवसायातून अनेकजण मालामाल झाले आहेत. स्थानिक नागरिकांना हाताशी धरून जंगलातील औषधी वनस्पती, विविध प्रकारच्या टिकाऊ वनस्पती लुटणे, त्यांची तस्करी करणे, असे प्रकार करणाऱ्या टोळ्या संक्रिय झाल्या आहेत.
दगड, डस्ट चोरीची उलाढाल लाखोंची
तालुक्यातील डोंगर, जंगलातील दगडांची तसेच डस्टची चोरी राजरोजपणे होत आहेत. मात्र त्यासाठी खनिज व भूगर्भ खात्याकडून तशी परवानगी घेतली गेल्याचे नमूद नाही. सरकारी आणि खाजगी डोंगरावर मोठ्या प्रमाणात दगड फोडले जात असल्याने डोंगर उध्वस्त होत आहेत.
10/10/2019
दसरा उत्सवातून धनगर गवळी समाजात एकीचे दर्शन
विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमातून दसरा साजरा
जोयडा:वार्ताहर
हार हार चांगभलं अशा घोषणा देत ढोलांच्या तालावर विविध प्रकारची गजानृत्य सादर करीत, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमानिशी धनगर गवळी बांधवांनी दसरा उत्सव साजरा केला. त्यानिमित्ताने जोयडा तालुक्यातील सुमारे 40 धनगर गवळी वाड्यावर ढोलांचा आवाज घुमत होता.
जोयडा तालुक्यातील तेरेगाळी, आमशेत, दुर्गी, वैजगाव, पायसवाडी, जळकट्टी, बीरामपाली, म्हाणाई, उसोडा, बाडगुंड, सुळावली, पोटोली, बोरी, चापळी, आडाळी, पनसोली, कुडुलगाव, हार्ली, कुंबेली नाके, कोळेमाळ, कुब्राळ आदी गावामध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला.
रविवारी रात्री जागर साजरा केला. या दिवशी रात्रभर गाजनृत्य सादर करण्यात आले. दुसऱ्यादिवशी सोमवारी प्रत्येक घरात जाऊन आरती घेण्यात आली व ताक प्रत्येक घरात जाऊन शिपडण्यात आले. यावेळी प्रत्येकाच्या कुलदेवतेला गाऱ्हाणे घालण्यात आले. मंगळवार हा या उत्सवातील सर्वात मोठा दिवस. या दिवशी सकाळी घरातील सर्व साहित्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर गावातील नागरिक गावात ठरलेल्या एका ठिकाणी येऊन आपल्या कुलदेवतेचे मांड बसवले. त्याठिकाणी प्रत्येकाच्या घरातून आणलेला दुडगा (ताक भरलेले मातीचे भांडे) येथे एक रांगेत ठेवण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या धार्मिक व सांस्कृतिक विधी करण्यात आले. त्यावेळी गाजनृत्य सादर करणे, माणसाच्या देव येणे, तलवारी खेळ खेळणे, एकमेकांच्या अंगावर ताक टाकणे असे खेळ खेळण्यात आले.
एकाच ताटात जेवण करण्याची पद्धत...
यावेळी सर्वांनी प्रसाद म्हणून आणलेला दूधभात एक ताटात घेऊन तो सर्वांनी सेवन केला.(धनगर भाषेत त्याला एका ताटात उस्टावळ करणे म्हणतात.)त्यातून धनगर गवळी बांधव एकतेचे दर्शन देतात. एका ताटात जेवण करण्याची पद्धत ही फक्त धनगर गवळी समाजात आहे.
30/09/2019
तालुका भाजपमध्ये वादाची ठिणगी
अध्यक्ष निवडीवरून वादाला तोंड, भाजपमध्ये दोन गट?
जोयडा: बम्मू फोंडे
भाजपचे विद्यमान जोयडा तालुका अध्यक्ष तुकाराम मांजरेकर यांचा कार्यकाळ संपत आल्याने नव्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाला आहे. याच शर्यतीतून भाजपचा बालेकिल्ला म्हणून गेल्या दोन वर्षांपासून ओळख झालेल्या रामनगर येथे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये वादाची ठिणगी उडाली आहे.
सद्याच्या स्थितीत रामनगरमध्ये भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. ही गटबाजी नवीन नाही, ती गेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीपासून दिसून येते आहे. ही गटबाजी तालुका अध्यक्षपद निवडीवरून पुन्हा उफाळून आली आहे. त्यात नवे व जुने असा काहीसा भेदभाव निर्माण झाला आहे. यातील एका गटाला रामनगर जिल्हा पंचायत मतदार संघातील उमेदवाराला यावर्षी तालुका अध्यक्षपद मिळावे असे वाटते आहे, त्यासाठी त्या गटाचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसऱ्या गटाला भाजपमध्ये एकी कायम ठिकूण ठेवण्यासाठी तुकाराम मांजरेकर यांची अध्यक्षपदी फेरनिवड करावी असे वाटते, त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेतुन आपले मत मांडले आहे. मांजरेकर हे तालुका केंद्रापासून जवळ राहत असल्याने त्यांना तालुक्याच्या समस्या मांडण्यात सोपे होणार आहे.त्यामुळे त्याची अध्यक्षपदी फेरनिवड करावी या गटाची मागणी आहे.
युवा नेतृत्वाला संधी?
तरुण आणि तडफदार नेत्याकडे तालुक्याची जबाबदारी सोपवावी, जेणेकरून पक्ष बळकट करणे सोपे होईल असे बहुतांश नेत्यांना वाटत आहे. नवी पिढी ही भाजपकडे वळत असल्याचे काहीसे चित्र दिसून येते आहे, त्यामुळे प्रत्येक निवडणूकीत भाजपला मिळणाऱ्या मतांचा आकडा वाढत आहे. म्हणून युवा नेत्याकडे भाजपचे तालुक्याचे नेतृत्व गेल्यास पक्ष वाढीस सोपे होणार आहे, कारण नव्या पिढीशी जुळता, मिसळता अध्यक्ष भाजपला तालुक्यात हवा आहे. असे अनेकांचे मत आहे.
गटबाजीचे मूळ कुठे?
भाजपसाठी गटबाजी ही नवीन नाही, निवडणुकीच्या तोंडावरील गटबाजीने तालुक्यात भाजपची अद्याप पाठ सोडलेली नाही. प्रत्येक निवडणूकीत गटबाजी दिसून आली असून त्याचा फटका भाजपला सोसावा लागला आहे. दीड वर्षांपूर्वी रामनगर पंचायतीवर भाजप समर्थकांचे वर्चस्व होते. मात्र अविश्वास ठराव आणल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. तेव्हा काहींनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता. तेव्हापासून गटबाजी उदयाला आली होती. जेडीएस पक्षातून निवडून आलेले सुनील हेगडे हे गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले व आपल्यासोबत आपले कार्यकर्ते घेऊन गेले. तेव्हापासूनच नवे व जुने कार्यकर्ते असे शीतयुद्ध सुरू झाले. त्याचा फटका भाजपला त्या निवडणुकीत सोसावा लागला होता. त्यावेळी काही कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत व त्यानंतर कारवाई करण्यात आलेले कार्यकर्ते सुनील हेगडे सोबत दिसून आले नाहीत. त्यातून जुने व नवीन कार्यकर्त्यांचा वाद समोर आला आहे. त्यामुळे गटबाजी भाजपसाठी पुन्हा धोकादायक ठरणार आहे की त्यातून वेगळा मार्ग काढता येईल याचा विचार वरिष्ठ करीत आहेत.
अद्याप अध्यक्षपद निवडीची प्रक्रिया नाही...
अद्याप नवीन तालुका अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मात्र इच्छुकांनी अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरू केले आहे. इच्छुकांची संख्या वाढत असून त्यातुन स्पर्धा निर्माण होत आहे. प्रत्येक पंचायत पातळीवर, बूथ पातळीवर समित्या स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र येथेही गटबाजी भाजपची डोकेदुखी बनणार आहे.
23/09/2019
रक्ताळलीय भूमी; भयभीत जनता संतापलीय
जोयडा तालुक्यातील स्थिती: वन्य प्राणी -माणूस संघर्ष वाढला
जोयडा:बम्मू फोंडे
गेल्या दीड महिन्यापासून जोयडा तालुका आणि आजूबाजूच्या परिसरातील भूमी वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने रक्ताळत आहे, वन्य प्राणी आपला जंगलाचा अधिवास सोडून गावांच्या आजूबाजूलाच वास्तव्य करीत असल्याने वन्यप्राणी विरुद्ध माणूस असा संघर्ष जणू जोयडा वासीयांच्या पाचवीला पुजलेला आहे. महिनाभरापासून हा संघर्षात अधिकच वाढलेला दिसून येतो आहे. ८० पेक्षा अधिक जनावरांचा बिबटा, वाघांच्या हल्ल्यात झालेला मृत्यू, डुकराच्या हल्ल्यात परवाच मरणं पावलेला शेतकरी, शिंगरगाव पंचायत क्षेत्रातील मालंबा गावच्या महिलेवर आणि बजारकोनांग पंचायत क्षेत्रातील करंजे येथील शेतकऱ्यावर अस्वलाने केलेला हल्ला अन त्यात रक्ताळलेली ती माणसं पाहून संपूर्ण तालुका हादरला आहे. परिणामी वन्यप्राण्यांची दहशत वाढल्याने नागरिक भयभीत झालेच आहेत पण संतापाची लाटही उद्भवू लागली आहे.
पूर्णतः जंगल त्यात उभे असलेले डोंगर....त्या डोंगर दऱ्यातून वाहणारे काळी, पांढरी, कानेरी नदीचे पात्र... समुद्रा सारखे भासणारे सुपा धरणाचे पाणी..त्याच्या सानिध्यात असलेल्या लहान लहान लोकवस्त्या.. असे आपले भौगोलिक वेगळेपण सांगणारा हा पूर्वीचा सुपा आणि आताचा जोयडा तालुका आज जगाच्या नकाशावर इको टुरिझमचे केंद्र बनते आहे. त्यामुळे संशोधन व जंगलाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता वन्य प्राण्याकडून होणारे हल्ले यामुळे तालुक्याचे विचलित प्रतिबिंब जगासमोर जात आहेत पण येथील सांस्कृतीवर त्याचा परिणाम होत आहे.
शेती, जंगलातील फळे, भाज्या यांच्यावर अवलंबून असलेली येथी आदिवासी संस्कृती धोक्यात येत आहे. आपली गुरेढोरे बाळगून व पूर्णतः जंगलावर अवलंबून असलेल्या येथील कुणबी आणि धनगर गवळी या आदिवासी समाजांना वन्य प्राण्यांचे वाढते हल्ले हा मोठा धक्का आहे. कारण ज्या जंगलावर आपली पिढी जंगली त्या जंगलात जाणे धोक्याचे ठरू लागले असल्याने तेही भयभीत झाले आहेत. शेतकरी राजा तर दोन्ही बाजूने कंगाल होऊ लागला आहे. त्यातून वन्य प्राण्यांना कसे रोकता येईल याचीच चारच महिनाभरापासून गावागावात होताना दिसत आहे.
नुकसान भरपाई देऊन हल्ले थांबणार नाहीत
गेल्या काही वर्षात जंगलातल्या प्राण्यांनी जंगलाजवळच्या खेड्यात, आदिवासींच्या पाड्यात घुसून गाई, कुत्री ठार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. काही लोकांवर या प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकांचे बळीही गेले आहेत. जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना वन खात्याकडून नुकसान भरपाई दिली जात असली, तरी ती अत्यल्प तर असतेच, पण या आर्थिक सहाय्याने अशा हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुंबांवर झालेला आघात काही भरून येत नाही. तसेच हल्ले काय थांबणार नाहीत.
जनावरेही बनताहेत प्राण्यांचे भक्ष्य
जोयडा दांडेलीच्या जंगलातल्या हत्तीच्या कळपांची दहशत गोव्या बरोबर महाराष्ट्रमध्येही अनेकवेळा पाहायला मिळतेच पण ही दहशत येथील स्थानिकांच्या मनामनात रुजलेली आहे. बिबट्या, वाघ, अस्वल, गवेरेडे, डुक्कर ह्या हिंसक प्राण्यांची संख्या वाढत असल्याने त्यांची दहशतही वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून जंगलात पाणी आणि अन्नाची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे हे जंगली प्राणी आपले भक्ष्य मिळवायसाठी जंगलाच्या परिसरातल्या गावात घुसायला लागले आहेत. गोठ्यातल्या गाई, म्हशी हे त्यांचे भक्ष्य बनू लागले आहे. जंगलात गेलेल्या लोकांवरही वन्य प्राण्यांकडून हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
वन्य जीव सप्ताहाने जोयड्याला काय दिले
निसर्ग आणि वन्यजीव यांच्याविषयी नव्या पिढीत आस्था वाढविण्यासाठी वन विभागाने १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जोयडा तालुक्यात वन्य जीव सप्ताह होणार आहे. मात्र या सप्ताहाच्या माध्यमातून वन विभाग नेमके काय धडे देणार आहे. प्रत्येक वर्षी असे सप्ताह होत असतात पण त्यातून होणारी जागृती ही फक्त कागदावरच दिसून येते आहे. त्यामुळे वन्य जीव सप्ताह यातून जोयडा तालुक्याला काय मिळाले.
Address
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Bammu bhagu phonde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Shortcuts
- Address
- Alerts
- Claim ownership or report listing
-
Want your business to be the top-listed Travel Agency?