Dipdaksh Tour Travels Consultancy

  • Home
  • Dipdaksh Tour Travels Consultancy

Dipdaksh Tour Travels Consultancy Kokan full package seva

11/06/2019
09/06/2019
23/05/2019
07/05/2019
07/05/2019

#गुहागर 😊

रत्नागिरीसह संपुर्ण कोकणाला समुद्रकिनारा लाभला आहे. जिल्ह्याच्या पुर्व, दक्षिण व उत्तरेकडील भागाला १० ते १५ वर्षापुर्वी गुहागर काहीसे लांब पल्ल्याचे वाटायचे. त्याला कारणही तसेच होते, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गापासुन चिपळुण शहरापासुन गुहागर ४५ कि.मी.अंतरावर आहे. एकेरी मार्गाने वाहतुक व्यवस्था असल्याने गुहागरला जाताना दोन ते अडीच तास लागत असत.

एन्रॉन प्रकल्पामुळे गुहागर ख-या अर्थाने जगाच्या नकाशावर आले.गुहागर तालुक्यातील रानवी अंजनवेल या माळरानावरील भुमिपुत्रांनी कंपनीविरोधात दिलेला लढ्यामुळे गुहागरचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले.

कोकणाच्या विकासाला थोडी गती मिळत होती. तसतसा गुहागर गाव जवळ येवु लागले. एन्रॉन कंपनीने गुहागरकडे जाणारा रस्ता दुहेरी केला. जयगड , दाभोळ या दोन्ही खाड्यामधुन वाहतुक सुरु झाली नी गुहागरची पर्यटन दृष्टया वाटचाल सुरु झाली.

मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच गुहागर येथे गेलो तो २०११ साली. नोकरीची पहिली नियुक्ती गुहागर येथे झाली. आई-वडील जिल्ह्याच्या पश्चिमेकडील शेवटच्या टोकावर माझी नियुक्ती झाल्याने अस्वस्थ झाले होते. वडील एस्.टी.महामंडळामध्ये असल्यामुळे नोकरीस असताना गुहागर अगदी जवळुन पाहीले होते. माझी पहिलीच पोस्टिंग असल्याने ती नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.

२०११ ते २०१५ या कालावधीत मी गुहागर तालुक्यात नोकरी केली. मी नोकरी केली ती सरकारी दृष्ट्या म्हणत आहे. कारण माझ्यादृष्टीने मी आजवर जगलेल्या आयुष्याचा तो ‘सुवर्णकाळ’ होता असे मी म्हणेन. कारण एस.टी.मधुन पहिले पाऊल मी गुहागरात टाकले नी आज तिथुन बदली होऊन ४ वर्षे झाली तरीही गुहागर हे मला माझं ‘ पहिलं प्रेम ’ वाटतं. म्हणुनच गुहागरची ओढ आजही मनाला कायम लागलेली असते. निसर्गाने पुन्हा मानवी जीवन बहाल केले तर मनोमनी माझा जन्म माझ्या आत्ताच्या आई वडिलांच्या पोटीच व्हावा फक्त तो गुहागरात व्हावा हिच इच्छा आहे.

तुम्ही म्हणाल असं काय आहे गुहागरात ? गुहागर गाव पहायचे असेल तर मुंबई किंवा पुणेकरांनी प्रवासाची सुरुवात चिपळुणकडुन न करता मुद्दामहुन दापोलीकडून करायला हवी. वाशिष्ठी नदीची चमकणारी चमत्कारीक दाभोळची खाडी ओलांडली की धोपावे किंवा वेलदुर गावातुन तुमचा प्रवास सुरु होतो. रानवी , अंजनवेल मार्गे सरळ आलो की आरे गावातील धारदेवी मंदिराजवळ एक अवघड वळन येते, त्या वळणावर पहिल्यांदा येणा-या माणसाला थांबण्याचा मोह आवरता येत नाही. कारण समोर दिसते ते डोळ्याचे पारणे फेडणारा नारळ, पोफळींच्या बागांनी , विविध वृक्षवेलींनी आच्छादलेला व हिरवागार भुप्रदेश आणि त्यावर साज म्हणुन की काय त्या भुप्रदेशातुन वळणे घेत वाहणारी आरे गावची नदी निळाशार समुद्राला जाऊन बिलगताना दिसते. सुरुबन व नारळ पोफळीच्या बागांच्या पलीकडे दिसणा-या फेसाळणा-या लाटा, चांदीसारखी चमकणारी पुळण असलेला समुद्रकिनारा नी आकाशात शुभ्र कापसासारखे पिंजुन ठेवलेले ढग दिसतात. निसर्गाच्या या अभिजात कलाकृतीचे नाव गुहागर आहे हे कळेपर्यंन्त आपण गुहागरच्या प्रेमात पडलेलो असतो.

जयगड व दाभोळच्या खाडीच्या मध्ये समुद्रकिना-यावर हे गाव वसलेले आहे. आरेच्या डोंगरउतारावरुन रस्त्याने खाली जात असताना रस्त्यांच्या दोहोबाजुंनी हापुस आंब्याची कलमांच्या बागा आपले स्वागत करतात. पुढे जाताना समुद्र किना-याला समांतर असणा-या रस्त्यांच्या दोन्ही बाजुंनी कोकणातील पारंपारीक प्रकाराची अंगण असलेली कौलारु घरे दिसतात. गुहागर गावचे नैसर्गिकदृष्टया दोन भाग पडलेले आहेत. त्याला खालचा पाट व वरचा पाट असे म्हणतात.वरचा पाट ते खालचा पाट या भागात पश्चिमेकडील प्रत्येक घराच्या मागे नारळ पोफळीची आगरे आहेत.त्यांना वाडी म्हणतात, प्रत्येक वाडीत गोड्या पाण्याची विहिर आहे आणि एक वाट ही समुद्राच्या किना-यापर्यंन्त गेली आहे.

गुहागर गावाच्या मध्यावर असलेले श्री देव व्याडेश्वर शिवमंदिर हे अनेक चित्पावन ब्राम्हण कुटुंबियाचे हे कुलदैवत आहे. गुहागर ची दररोज ची पहाट ही याच श्री देव व्याडेश्वराच्या शिवमंदिरातुन होणा-या शंखनाद व चौघड्यांच्या सुमधुर संगीताने होते.

पहाटे गुहागर समुद्रकिना-यावरुन फिरताना पुळणीवर फिरणारे सागरी जिवांचे निरीक्षण करताना मजा वाटते. सुर्याची सोनेरी किरणे नारळ पोफळीच्या बागेतुन वाट काढत किना-यावरील वाळुवर पडली की संपुर्ण समुद्रकिनारा सोनेरी होवुन जातो. स्वच्छतेच्या बाबतीत गुहागर समुद्रकिनारा हा संपुर्ण कोकण किनारपट्टीवरील क्रमांक एकचा आहे. ५ किलोमीटरचा लांबीचा हा किनारा नारळी-पोफळी आणि सुरुच्या दाट झाडांनी सुशोभित आहे. गुहागरची सायंकाळ ही रम्य या शब्दाला साजेशी आहे. स्वच्छ सुंदर समुद्र किनारा, एक पर्यटन जेटी व समुद्रदर्शनाचा आनंद दुरवरुन घेणेसाठी प्रशासनाने सहकुटुंब बसण्याची केलेली व्यवस्था यामुळे समुद्राच्या पाण्यावरील आभाळाची लाली पाहत सुर्यास्त पाहताना मन हरपुन जाते. लहान मुलांना खेळण्यासाठी किना-यावर बगीचा व विविध खेळणींची व्यवस्था आहे. रात्री तर या समुद्रकिना-यावर बसण्याची गंमत काही वेगळीच आहे. दुरच्या क्षितीजावर लुकलुकणा-या मासेमारी करणा-या बोटींचे दिवे, जवळुनच कानावर धडकणारी समुद्रांच्या लाटांची गाज नी थंडगार वारा हे सगळं स्वप्नवत वाटतं. रात्रीही या समुद्रावर मानवी धोका नाही. प्रशासनाने येथे ‘हायमॅक्सची ’ ची सोय केली आहे तसेच गुहागर पोलीस स्टेशन इथे हाकेच्या अंतरावर आहे. विदेशी व स्थानिक पर्यटकांना इथे कसलीही मानवी भिती नसली तरी किना-यापासुन समुद्रात खोलवर पाण्यात जाण्याचे टाळावे. खोलवर जाऊन पोहोणेसाठी हा समुद्रकिनारा धोकादायक आहे.

गुहागर हे सांस्कृतिक ‘गाव’ आहे. मी गाव हा शब्द मुद्दामहुन वापरतोय कारण गुहागर नगरपंचायत होवुन शहरासारख्या सुखसुविधा प्राप्त झाल्या असल्या तरी गुहागरकरांनी याचे ‘ गावपण ’ टिकवुन ठेवले आहे. होळी म्हणजेच कोकणातला शिमगा हे इथले खास आकर्षण आहे. पारंपारीक वेशातील संकासुर व गोमु हे जगप्रसिद्ध आहेत. तसेच भंडारी बांधवांची एकजुट दाखवणारा समा हा सुद्धा वैशिष्टपुर्ण खेळ असतो. भंडारी बोली भाषेचे वेगळेपण इथे आहे. गुहागर मध्ये क्रिकेट व कब्बडी हे खेळ प्रामुख्याने खेळले जातात. गुहागर समुद्र किना-यावरील पुळणीमध्ये पावसाळ्यात क्रिकेट व कब्बडी आवडीने खेळले जाते.

खाद्यसंस्कृतित इथे विवीधता आढळते तरीही मासेमारी चे प्रमाण जास्त असल्याने इथे जेवणात मासे हे प्रामुख्याने आढळतात. तसेच येथील आठवडा बाजारात सुकी खारवलेली मच्छी प्रामुख्याने मिळते. समुद्राचा आनंद लुटल्यावर पोटातील भूक शमविण्यासाठी सोलकढी, उकडलेले मोदक, माशांचे विविध प्रकार, नारळाची आमटी, तांदळाची भाकरी अशा लज्जतदार कोकणी पदार्थांनी भरलेले ताट तयार असते. किनाऱ्याजवळच चांगली हॉटेल्स आणि घरगुती खानावळी आहेत. गुहागरात प्रामुख्याने आंबा,फणस,काजू, सुपारी ,नारळ हि फळे मुबलक प्रमाणात मिळतात.

गुहागर गावाच्या शेजारी असणारी वेलदुर , धोपावे, अंजनवेल, असगोली ,पालशेत, वेळणेश्वर , हेदवी , तवसाळ , नरवण ह्या गावांनाही समुद्रकिनारा लाभलेला आहे. गुहागरपासुन काही अंतरावरच वेळणेश्वर व अंजनवेल गोपाळगड किल्ल्यावरील शिवमंदिरे , हेदवी येथील गणेश मंदिर येथे प्रसिद्ध आहेत.

गुहागर व परिसरातील आणखी एका वैशिष्टाचा उल्लेख मला करावा लागेल. ‘ कोकणची माणसं साधी भोळी , काळजात त्यांच्या भरली शहाळी ’ हे शब्दान शब्द् इथल्या माणसांना लागु होतो. इथे येणारा पर्यटक असो किंवा कॉलेज मधुन लेक्चर बंक करुन येणारी मुलं असोत कुणाशीही आजवर गैरवर्तन केलेचे ऐकवित नाही. माझ्या रक्ताच्या नात्याचे इथे कोणीही नसले तरीही त्या पलीकडे जावुन इथल्या विविध जातीधर्माच्या माणसांनी मला घरचा माणुस म्हणुन वागणुक दिली ती माझ्या ह्ददयात साठवुन ठेवली आहे.

तीनही बाजुंनी हिरव्यागार डोंगरांचा साज व एका बाजुला अथांग निळाशार समुद्र आणि नारळ पोफळीच्या आगारातुन आकाशाकडे डोकाऊ पाहणारी लाल मातीची कौलारु घरं पाहताना निसर्ग नववधुसारखा साजशृँगार करुन स्वत:ला आरशात न्याहाळत आहे असे वाटते.

अशा या गुहागरला नक्की भेट द्या , कारण गुहागरच्या समुद्र किना-याची गाज, इथला थंडगार वारा आणि इथली माणसं तुमच्या आयुष्यातील चार क्षणांना निवांतपणा देणारी आहेत.
!! येवा कोकण आपलाच असा !!

गुहागर, चिपळूण येथील छायाचित्र 🙂.

30/04/2019

Village

Village😍
30/04/2019

Village😍

25/04/2019
प्राचीनकाळी दालभ्य ऋषींच्या नावावरून यास दाभोळ नाव पडले असे मानले जाते.दापोलीकडून दाभोळ गावात प्रवेश करताना सड्यावरून खा...
19/04/2019

प्राचीनकाळी दालभ्य ऋषींच्या नावावरून यास दाभोळ नाव पडले असे मानले जाते.

दापोलीकडून दाभोळ गावात प्रवेश करताना सड्यावरून खाली चिपळूणकडील येणारी वाशिष्ठी नदी, पलीकडील डोंगरावरचा गोपाळगड किल्ला व टाळकेश्वरच्या देवळाचे शिखर, दाभोळकडील बाजूचे मशिदीचे मिनार, शिळावरचे मारूती मंदिर, समुद्र किना-याला लागून वाढलेले सुरूचे दाट बन आणि खाडीच्या किनारपट्टीत वाढलेले उंच माड दिसतात. दाभॊलच्या अलीकडील माडाच्या हिरव्यागार झावळयांचा गुच्छ करून वा-याच्या झुळकीने येणार्‍याचे स्वागत, आणि जाणारांना निरोप देताना दिसतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ता ही शोभा अवर्णनीय असते. कोकणातल्या समुद्रकाठच्या कुठल्याही खेडयात साधारणत: असेच वातारण असते पण दाभोळच्या या पार्श्वभूमीला, प्रचंड घडामोडींच्या इतिहासाचा रक्तरंचित गूढ पडदा आहे.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दाभोळइतके जुने आणि प्रसिद्ध बंदर नव्हते. टॉलेमीच्या सर्वात जुन्या नकाशात दाभोळचा उल्लेख आहे. दाभोळ प्राचीन काळी दालभ्यवती होती, महिकावती होती. नंतर ती हामजाबाद होती. मैमुनाबादही एक वेळ दाभोळचे नाव होते. दक्षिण भारतातील बहुसंख्य मुसलमान यात्रेकरू मक्केला जाण्यासाठी दाभोळ बंदारात येत असत. त्यामुळे दाभोळला बाबुलहिंद म्हणजे मक्केचा दरवाजा असेही म्हणतात.

इथला तलम वस्त्रांचा व्यापार मोठा होता. अत्यंत कसबी कारागीर येथे वस्त्रे विणत असत. १९व्या शतका्पर्यंत इथला साळीवाडा गजबजलेला होता आणि धोटयांचा लयबद्ध ठोक्यांवर इथे सुंदर वस्त्रे विणली जात होती. शिवशाहीतील आरमारांत येथील भंडारी समाजाचे प्रभुत्व होते. या इतिहासाच्या खाणाखुणा येथील किनारपट्टीत, डोंगरांवर, सपाटीवर सर्वत्र दिसून येतात. दाभोळ गावात पडझड झालेल्या इमारती रस्तोरस्ती, डोंगरकपारीतून दिसतात.
चंडिकादेवी मंदिर
दापोली-दाभोळ रस्त्यावर दाभोळच्या अलीकडे पठारावर तीन किमी. अंतरावर डाव्या हाताला मुख्य रस्ता सोडून वसलेले चंडिकादेवी मंदिर हे स्वयंभू समजले जाणारे स्थान आहे. एकसंध दगडात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये देवीची सुमारे साडेतीन फूट उंचीची काळया पाषाणतील शेंदूर लावलेली मूर्ती आहे. देवीला चार हात असून हातात तलवार, ढाल व इतर आयुधे आहेत. देवीच्या मूर्तीजवळच एक इतिहासकालीन तलवार असून ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, अशी येथील पुजार्‍यांची श्रद्धा आहे. चांदीच्या पत्र्याने मढवलेले गुहेचे तोंड लहान असून, आत वाकून जावे लागते. गुहेत उतरत्या वाटेवर पायऱ्या त्याच खडकात कोरलेल्या आहेत. त्यांवरून सुमारे पाच-सहा फूट अंतर आत चालत जावे लागते. ही वाट पूर्ण अंधारी आहे. या वाटेवर इतका काळोख आहे की पुढे कोणत्या दिशेला कसे जावे हे चटकन समजत नाही. परंतु डोके थोडे खाली वाकवून तसेच अंधारात अंदाजाने पुढे गेल्यावर देवीपुढच्या समईचा मंद प्रकाश दिसतो आणि हायसे वाटते. या ठिकाणी उजवीकडे वळल्यानंतर आपण देवीसमोर येतो. या देवीला फक्त तेलाच्या दिव्याच्या प्रकाश चालतो. इतर कोणत्याही प्रकारचा प्रराकाश किंवा कॅमेर्‍याचा फ्लॅश लाईट लावलेला चालत नाही, असे येथील पुजारी सांगतात. देवीच्या उजवीकडे अंधार्‍या जागी असलेले एक भुयार थेट काशीला (?) जाते असेही पूजारी मंडळी सांगतात. देवीचे मन प्रसन्न करणारे गूढगंभीर पण आश्वासक रूप पाहून पुढे वाकूनच जावे लागते. यावेळी आपला उजवा हात खडकाला स्पर्श करून पुढे जात देवीला प्रदिक्षणा पूर्ण झाली की आपण पुन्हा मूळ जागी येतो व तेथून डावीकडे वळून आल्या मार्गाने परत बाहेर पडता येते.

चंडिकादेवी मंदिर हे मंदिर अतिशय पुरातन असून याला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली होती असा उल्लेख इतिहासात असल्याचे समजते. दाभोळ जिंकल्यावर राजांनी पुढे अंजनवेलचा गोपाळगड, गोवळकोट व आडीवरे भागावर स्वारी केली. या मोहिमेरम्यान त्यांनी अनेक वेळा या स्थानास भेट दिली होती. पुढील काळात मात्र हे स्थान लोकविस्मृतीत गेले. कालांतराने जमनापुरी नावाच्या दाभोळमधील साधकास देवीने स्वप्राप्त दृष्टांत दिला. त्यानुसार त्यांनी या गुहेचा शोध घेतला व अनेक वर्षे ते देवीची निस्सीम भक्ती व पूजाअर्चा करत राहिले. अखेरीस चंडिकामातेच्या समोरच ते समाधिस्थ झाले. गुहेतून बाहेर पडल्यावर समोरच्या दगडी चौथर्‍यावर त्यांची व त्यांच्याच कुळातील आणखी एका साधकाची समाधी आहे. पुरी घराण्याकडेच आजही देवीची पूजा, अभिषेक करण्याचे हक्क आहेत. या चौथर्‍यावर तुळशी वृंदावन व छोटी-छोटी शिवलिंगे दिसतात. येथून खाली पायऱ्या उतरून गेल्यावर बारमाही झुळूझुळू वाहणारा थंड पाण्याचा झरा आहे.

मंदिरपरिसराच्या बाहेर दिसणारे तटबंदीचे पडके अवशेष दाभोळच्या किल्ल्याचे आहेत. या किल्याबद्दलची फारशी माहिती उपलब्ध नाही. इतर मंदिरापेक्षा वेगळे असे हे गूढरम्य स्थान आवर्जून पाहावे असे आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीच्या खाडीत उभारण्यात आलेला जलदुर्ग प्रकारातील जयगड किल्ला विजापूरकरांनी बांधला. अरबी स...
18/04/2019

रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीच्या खाडीत उभारण्यात आलेला जलदुर्ग प्रकारातील जयगड किल्ला विजापूरकरांनी बांधला. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जयगड गावातील उंच टेकडीवर हा किल्ला उभारण्यात आला आहे. सागरी क्षेत्रावर लक्ष देण्याच्यादृष्टीने हे स्थान महत्वाचे असावे.

किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे १६ व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. १५७८-८०च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशाहने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे १६९५ च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. १८१८ च्या इंग्रज-मराठा युद्धाच्यावेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला.
गावाच्या उत्तरेस असलेला हा किल्ला उत्तर, पूर्व आणि पश्चिम या तिन्ही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. किल्ल्यात दक्षिणेकडील दिंडी आणि पश्चिमेकडील चोर दरवाज्यातून प्रवेश करता येतो. किल्ला १२ एकर परिसरात पसरलेला असून अजूनही मजबूत अवस्थेत आहे. बालेकिल्ला आणि परकोट या दोन भागात किल्ल्याची रचना केली आहे. बालेकिल्ल्यास महाद्वार आहे. किल्ल्याला जांभा पाषाणापासून बनविलेली मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या बाजूला खंदक कोरलेले आहेत. किल्ल्याला एकूण २८ बुरूज असून या बुरूजावरून समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येते. परकोट किल्ल्यात काही विहिर, गुहा आणि पाषाणस्तंभ आहेत.
बालेकिल्ल्यातील तटबंदीच्या बाजूस कोठार बांधलेले आहे. त्याच्या बाजूस तबेले आहेत. मधल्या बाजूस गणपती मंदीर आहे. मध्यावर कचेरीची इमारत आणि निवासस्थानाचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्यात विहिरीद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आढळते. किल्ल्याच्या बुरुजावरून संपूर्ण खाडीचा परिसर दृष्टीपथास पडतो. किल्ल्याच्या संरक्षणाच्यादृष्टीने सर्व प्रकारची काळजी किल्ला उभारतांना घेतलेली किल्ल्याच्या बांधणीवरून जाणवते. जयगड किल्ल्याच्या दरवाजापर्यंत वाहन पोहचते.
किल्ल्याच्या बाजूस असलेल्या जयगड बंदराचा उपयोग व्यापाराच्यादृष्टीने पूर्वीपासूनच केला जात आहे. किल्ल्यापासून पाच किलोमीटर अंतरावर कऱ्हाटेश्वर मंदिर आहे. वाहन थेट मंदिरापर्यंत जाते. समुद्र किनाऱ्यावरील एक मोठ्या खडकावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. समुद्राच्या बाजूचा उंच कडा पाहतांना थरारक अनुभव येतो. मंदिराच्या खालच्या बाजूस गोमुखातून अखंड वाहणारा झरा आहे. रत्नागिरीहून गणपतीपुळमार्गे जयगडला जाता येते. हे अंतर ४६ किलोमीटर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून निवळीमार्गे जयगडला भेट देता येते.

महाराष्ट्रातील जवळजवळ सगळेच समुद्रकिनारे हे सुंदर, शांत, स्वच्छ आणि निसर्ग रमणीय आहेत. गुहागरचा समुद्रकिनारा सुद्धा याला...
18/04/2019

महाराष्ट्रातील जवळजवळ सगळेच समुद्रकिनारे हे सुंदर, शांत, स्वच्छ आणि निसर्ग रमणीय आहेत. गुहागरचा समुद्रकिनारा सुद्धा याला अपवाद नाही. खरंतर गुहागर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे वैभवच म्हणावे लागेल. वासिष्ठी आणि जयगड खाड्यांच्यामध्ये वसलेले गुहागर हे अत्यंत टुमदार असे छोटेसे गाव असून त्याला लाभलेला सुंदर निसर्गरम्य किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे इथे वारंवार यावेसे वाटणारे आकर्षण नक्कीच आहे.

मुंबईपासून 280 कि.मी. असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरला सुरुचे बन असलेला अत्यंत सलग आणि सुरेख असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याचबरोबर श्री व्याडेश्वर आणि श्री दुर्गादेवीची नितांत रमणीय मंदिरे या परिसराची शोभा अजूनच वाढवतात. इथे मिळणारे अगदी खास कोकणी पद्धतीचे पदार्थ पर्यटकांना या प्रदेशाची भुरळ पाडतात. समुद्रकिनाऱ्याला समांतर जाणारा एकमेव रस्ता या गावाला लाभलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या घरांची अंगणे विविध रांगोळ्यांनी सजवलेली असतात. व्याडेश्वराचे पुरातन मंदिर गावाच्या अगदी मधोमध वसले असून त्यामुळे गावचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. एक म्हणजे खालचा पाट आणि दुसरा वरचा पाट.
गुहागर हे आंबा, फणस, काजू, सुपारी आणि नारळ या फळांसाठी सुप्रसिद्ध आहे. गुहागरच्या उत्तरेकडे असलेल्या अंजनवेल या गावाशी दाभोळ हे गाव फेरी बोटीने जोडले गेल्यामुळे गुहागरचे महत्त्व अजून वाढलेले दिसते. तसेच दक्षिण दिशेला हेदवीवरून जयगड हे गावसुद्धा फेरी बोटीने जोडल्यामुळे गुहागर हे रत्नागिरी तालुक्याशी जोडले गेलेले आहे. गुहागरला आल्यावर समुद्रात होणारा सूर्यास्त पाहणे यासारखी दुसरी रमणीय गोष्ट नाही. हा नयनरम्य सूर्यास्त पाहणे सुखकर व्हावे म्हणून स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना बसण्यासाठी उत्तम सोय किनाऱ्यावर केलेली आहे.
गुहागरचा पेशवे घराण्याशी फार पूर्वीपासून संबंध आलेला आहे. थोरले माधवराव पेशव्यांचे काका राघोबादादा यांची पत्नी आनंदीबाईचे माहेर या गुहागरचेच. इथून १५ कि.मी. वर असलेल्या कोतुळक या गावी असलेल्या ओक घराण्यात आनंदीबाईचा जन्म झाला होता.

दगडी बांधणीचे व्याडेश्वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत होय. अनेक चित्पावन ब्राह्मण कुटुंबियांचे हे कुलदैवत आहे. त्याचप्रमाणे नुकताच जीर्णोद्धार झालेले दुर्गादेवीचे मंदिरसुद्धा अत्यंत रमणीय ठिकाणी वसलेले आहे. गुहागरमध्ये अजून एक प्राचीन मंदिर असून ते उफराटा गणपतीचे आहे. इथे गणपतीचे तोंड पश्चिम दिशेला केलेले आढळते.
कसे जावे : गुहागर हे रत्नागिरी, पुणे आणि मुंबईशी रस्त्याने जोडले गेलेले असल्याने राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने गुहागरला जाता येते. तसेच कोकण रेल्वेवरील चिपळूण या रेल्वे स्थानकावर उतरुन परिवहनच्या किंवा खाजगी बसेसनी गुहागरला जाता येते.

चिनकाळी वाशिष्ठी नदीतून दाभोळ बंदर (दाल्भेश्वर) पासून चिपळूण पर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे. ह्या व्यापारी मार्...
15/04/2019

चिनकाळी वाशिष्ठी नदीतून दाभोळ बंदर (दाल्भेश्वर) पासून चिपळूण पर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे. ह्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वाशिष्ठी नदीच्या (खाडी) किनारी अंजनवेलचा किल्ला (गोपाळगड) बांधण्यात आला. मूळ किल्ल्यात अनेक राज्यकर्त्यांनी भर घालून किल्ला वाढवला, मजबूत केला.

इतिहास :किल्ल्याच्या बांधकामाच्या कालखंडा- विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.छत्रपती शिवरायांनी सन १६६० साली आदिलशाहकडून हा किल्ला जिंकून घेतला,त्यानंतर गोपाळगड व गोविंदगड असे त्याचे नामकरण करण्यात आले.छत्रपतींच्या काल- खंडात हा किल्ला जलवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र होता.

किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरुज आजही मजबूत अवस्थेत·उभे आहेत. तटबंदीवरून आजूबाजूच्या समुद्राचे विहंगम दृश्‍य दिसते. किल्ल्यावर धान्यकोठारे ,कातळात खोदलेल्या विहिरी आढळतात. तटबंदीवरून वसिष्ठि खाडीचे विहंगम दृश्य दिसते.

सध्या गडावर खाजगी मालकाने आंब्याच्या बागा लावल्या आहेत. किल्ल्याच्या मालकी हक्कावरून न्यायालयात वाद चालू असल्या मुळे किल्ल्याची हेळखांड झाली आहे.यावर इतिहासप्रेमीनी आवाज उठविणे गरजेचे आहे.

15/04/2019

आपला गुहागर - चला तर आप आपल्या गावाचे नाव comment करा

15/04/2019
हेदवीचं दशभुजा गणेश मंदिरहेदवीचं गणपतीचं देऊळ अतिशय प्रसिद्ध आहे. हे पेशवेकालीन मंदिर गुहागर शहरापासून साधारण वीस किलोमी...
15/04/2019

हेदवीचं दशभुजा गणेश मंदिर
हेदवीचं गणपतीचं देऊळ अतिशय प्रसिद्ध आहे. हे पेशवेकालीन मंदिर गुहागर शहरापासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर आहे. डोंगराच्या पायथ्याशी, एका बाजूला अगदी शांत परिसरात असलेलं हे मंदिर नुसतं पाहूनही मन प्रसन्न होतं. मंदिर परिसरात सुंदर उद्यान निर्माण करण्यात आल्यानं हा परिसर आणखी सुंदर झाला आहे. मंदिरातील मूर्ती ‘श्री दशभुजा लक्ष्मीगणेश’ या नावानं ओळखली जाते.

दशभुजा गणेशाची मूर्ती
हेदवीच्या गणपतीच्या दर्शनाला जाणारे लोक अधिक जाणकार असतील, तर त्यांची पावलं आपोआप गणपती मंदिराच्या अलीकडे असलेल्या बामणघळीकडे वळतात. बामणघळ हा निसर्गाचा अनोखा चमत्कार आहे. हेदवीपासून तीन किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस जाणारा उतार लागतो. या रस्त्याने गेल्यास समुद्रकिनारा लागतो. किनाऱ्याच्या उजव्या बाजूचा परिसर काळ्या कातळाने आणि डोंगराने वेढलेला आहे. या संपूर्ण परिसरात समुद्राच्या उसळत्या लाटांची कातळाशी पकडापकडी सुरू असते. किनाऱ्यावरच थोड्या अंतरावर उमा-महेशाचं एक सुंदर मंदिर आहे. डोंगरावरून येणारी गोड्या पाण्याची धार मंदिरात असलेल्या कुंडात पडते. मंदिरापासून थोडं आणखी पुढे डोंगराच्या दिशेने गेल्यावर कातळामध्ये समुद्रापर्यंत पडलेली एक उभी मोठी चीर दिसते. हीच ती प्रसिद्ध बामणघळ. किनाऱ्यावरून सुरू होणाऱ्या कातळापासून काही फूट आतपर्यंत ही घळ पडलेली आहे. एखादी अरुंद दरी असावी, एवढी, म्हणजे सुमारे दहा ते पंधरा फूट एवढी तिची उंची आहे. समुद्राच्या लाटांचं वेगानं येणारं पाणी या ठिकाणी वर्षानुवर्षं घुसून ही घळ तयार झाली आहे. लाटांचं पाणी एवढ्या वेगाने आत घुसतं, की कातळात तयार झालेले वेगवेगळे आकार पार करत ते घळीच्या अगदी वरच्या टोकापर्यंत शिरतं आणि तिथून वेगानं वर उसळतं. भरतीची वेळ असेल आणि लाटांचा जोर जास्त असेल, तर एवढ्या खोल असलेल्या घळीतूनही हे पाणी वेगानं वर आकाशाच्या दिशेने फेकलं जातं आणि कातळाच्या पृष्ठभागापासून काही फूट वर उडतं. घळीच्या अगदी वरच्या टोकापर्यंत किंवा बाजूलाही आपल्याला उभं राहता येत असल्यामुळे, कधीकधी आपल्यालाही या तुषारसिंचनाचा आनंद घेता येतो; मात्र ही घळ जेवढी सुंदर, तेवढीच धोकादायक आहे. अतिउत्साह दाखवणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात आल्याच्या घटनाही इथे घडल्या आहेत. सतत समुद्राचं पाणी उडून पडत असल्यामुळे कातळ निसरडे असण्याची शक्यता असते. पावसाळ्यात हा धोका जास्तच असतो. घळ अतिशय अरुंद आणि खोल असल्यामुळे हा चमत्कार पाहताना पूर्ण काळजी घेऊन आणि सुरक्षित अंतरावरूनच पाहणं योग्य. याच परिसरात उमराठ आणि नरवण येथील निसर्गरम्य परिसरात असलेली मंदिरंही पाहण्यासारखी आहेत

गुहागरजवळच्या बामणघळ परिसरातला निसर्गाचा चमत्कार पाहून थक्क व्हायला होतं. समुद्राच्या किनाऱ्यापासून कातळात पडलेल्या या उ...
15/04/2019

गुहागरजवळच्या बामणघळ परिसरातला निसर्गाचा चमत्कार पाहून थक्क व्हायला होतं. समुद्राच्या किनाऱ्यापासून कातळात पडलेल्या या उभ्या अरुंद भेगेतून लाटांचं पाणी वेगाने आत घुसतं आणि तसंच काही फूट वर उसळतं. या भन्नाट ठिकाणासह ‘चला, भटकू या’च्या आजच्या भागात गुहागरच्या निसर्गरम्य परिसराची सैर......
निसर्गानं काही भागांत असे चमत्कार करून ठेवले आहेत, की ते पाहताना थक्क व्हायला होतं. निसर्गाचं हे अनोखं रूप पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं. पृथ्वीच्या पाठीवर वेगवेगळ्या कारणांमुळे झालेल्या उलथापालथीत भौगोलिक रचना बदलली जाते आणि त्यातून निसर्गाचं हे अनोखं रूप समोर येतं आणि लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनून जातं. कोकणाच्या किनारपट्टीवर दृष्ट लागण्यासारखे अनेक किनारे आहेत. थोड्या आडबाजूला जाऊन शोध घेतला, तर काही विलक्षण ठिकाणं सापडतात. गुहागर तालुक्यात हेदवी या प्रसिद्ध देवस्थानाजवळची बामणघळ त्यापैकीच एक.

वेळणेश्वर या समुद्र काठच्या गावाला सृष्टीचा वरदहस्त लाभलेला आहे. गुहागर पर्यटन स्थळा मधेय वेळणेश्वर गावचा प्रामुख्याने उ...
15/04/2019

वेळणेश्वर या समुद्र काठच्या गावाला सृष्टीचा वरदहस्त लाभलेला आहे. गुहागर पर्यटन स्थळा मधेय वेळणेश्वर गावचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तीव्र उतारांचा वळनावळनांचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो.वेळणेश्वर हे गुहागर पासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर गाव आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वीपासून गाव इथे वसलेले आहे.वेळणेश्वर मंदिराचा इतिहास म्हणजेच या गावाचा इतिहास आहे.

सभोवताली नारळ - पोफळीच्या बागा , सुरक्षित आणि स्वच्छ समुद्र किनारा आणि लाटांच्या गाजेचे पार्श्वभूमीवर वेगळेपण जाणवते. वेला म्हणजे समुद्र किनारा , त्या तीरावर असणारा देव तो वेळणेश्वर किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून वेळणेश्वर . येथील गावकऱ्यांच्या मते 12 व्या शतकात इथे छोटे मंदिर होते त्यावेळी त्यास " वेळोबा " म्हणत.

मंदिर आवर खूपच मोठे आहे. त्यामाधेय 9-10 मित्र उंचीची दीपमाळ आहे. घुमटाकार शिखराचा सभामंडप , बाहेर पितळी ओटा , त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर पाच फन्यांचा नाग आहे. गाभाऱ्यात अडीच - तीन फुटी लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवट ठेवून पोशाख घालतात शिवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे. पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालीमाता , महिषासुरमर्दिनी , गोपाळकृष्ण यांच्या पंच धातूच्या तर विठ्ठल रखुमाई ची पाषाण मूर्ती आहेत. मुख्य मंदिराला लागुनच श्री काळ भैरव , श्री गणपती , श्री लक्ष्मि नारायण अशी मंदिरे आहेत . स्थानिक लोक या काळ भैरवाला कौल लावताना पहायची संधी मिळाल्यास ती जरूर बघावी.

;
वेळणेश्वर समुद्र किनाऱ्याचा विशेष उल्लेख करावा लागेल , स्वच्छ आणि सुरक्षित अशा समुद्रकिनारी मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग घुसला आहे त्याला " मेरुमंडल "म्हणतात.

अशा या निसर्ग समृद्ध ठिकाणाला सर्वांनी एकदा तरी अवश्य भेट द्यायला हवीच!

राहण्यासाठी खोल्या :
इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी गावात घरगुती तसेच जवळपास काही हॉटेल्स वगैरे आहेत. तसेच वेळणेश्वर भक्त निवसातही उत्तम सोय होऊ शकते.

कसे जावे :
गुहागर पासून राज्य परिवहन सेवा बसेस उपलब्ध आहेत. गुहागर पासून वेळणेश्वर २० किमी आहे. चिपळूण पासून वेळणेश्वर ५० किमी आहे.

Kokan full package seva😊
13/04/2019

Kokan full package seva😊

Address

Velneshawar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dipdaksh Tour Travels Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share