15/12/2023
Evening sky at Pipalkoti, Uttrakhand
Joyful Journeys To Delightful Destinations ! We are specialised in arranging Family tours to Kashmir, Ladakh, Sikkim, Rajsthan & Andaman.
Evening sky at Pipalkoti, Uttrakhand
Mesmerising Meghalaya with Joyful Journeys !
Book your seat now !
Best holiday season at Best Price !
Hurry ! Book your seat now !
Hurry ! Book your seat at the earliest !
चारधाम यात्रा सुफळ संपूर्ण .
यावर्षी श्री केदारनाथ बद्रीनाथ दर्शन घ्यावे अशी खूप प्रबळ इच्छा मनात आली त्यामुळे काही मोजक्याच मित्रमंडळींसह २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाच्या मुहूर्तावर हि ट्रिप चालू केली.
यामध्ये आम्ही ऋषिकेश, हरिद्वार, यमुनोत्री,गंगोत्री, श्री केदारनाथ, श्री बद्रीनाथ, यांसह गुप्त काशी, उत्तरकाशी, जिथे श्री महादेव व पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला ते ठिकाण म्हणजे श्री त्रियुगी नारायण मंदिर , गंगनानी हि सर्व यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली.
सर्व ठिकाणी दर्शन फार उत्तम रितीने पार पडले.
श्री केदारनाथ येथे तर स्वहस्ते देवाला अभिषेक व विशेष पूजा करता आली.. स्वयंभू महादेवांना स्पर्श करुन चंदन विलेपन पूजा केली, डोकं टेकून नमस्कार केला तेव्हाची मनातील भावना ही सांगण्यापलिकडील आहे..
श्री महादेवांनी आम्हाला एवढे छान दर्शन घेऊ दिले हि परमेश्वर कृपाच !!
श्री बद्रीनाथ येथेही खूप छान दर्शन झाले, सोबत बोनस म्हणून दुरुन का होईना योगी श्री आदित्यनाथ यांना सुद्धा बघायला मिळाले.. विशेष कौतुक म्हणजे त्यादिवशी त्यांची उपस्थिती तिथे असूनही त्यांनी भक्तांचे दर्शन थांबवले नव्हते..
हे झाले यात्रेबद्दल पण उत्तराखंडला निसर्गानेही भरभरून बरंच काही दिलं आहे त्यात आम्ही गरतांग गली हा भगीरथी नदीकाठचा एक खूप सुंदर ट्रेक ही केला, औली हे हिलस्टेशन रोपवेने बघितले, हर्सिल व्हॅली बघितली ,जगप्रसिद्ध असे ऋषिकेश येथील रिव्हर राफ्टिंग केले-- यात मध्यावर गंगा नदीत दोरी धरुन मारलेल्या उड्या तर निव्वळ अविस्मरणीय !
भगीरथी, अलकनंदा, या नद्यांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात थांबून केलेलं फोटो शूट...सगळं काही एकदम भारी होतं.
विष्णूप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग या पंचप्रयागांनी गंगा नदीच्या स्थापनेत घेतलेला पुढाकार बघितला..
आज एवढ्या सोई, बरेपैकी रस्ते असूनही ही यात्रा एवढी चॅलेंजिंग आहे तर जेव्हा या सोई नव्हत्या तेव्हा काय परिस्थिती असेल ही कल्पनाही अवघड आहे.
चारधाम बद्दल जाणवलेले काही तथ्यं आणि मुद्दे
१) हि यात्रा फक्त यात्रा म्हणून न करता सोबत निसर्ग भेटीसाठी ही निवांत वेळ प्लॅन करावा.
२) शक्यतो हि टूर कुठल्याही यात्रा कंपनीतर्फे न करता कस्टमाईज टूर अरेंज करुन घ्यावी
३) रस्ते आणि प्रवास तसेच ट्रॅफिक जाम साठी लागणारा वेळ हा टूर प्लॅन करताना गृहीत धरावा, त्यानुसारच प्लॅन करावा.
४) रोज १५०- १८० किमी पेक्षा जास्त प्रवास ठेऊ नये
५) प्रवासापूर्वी एक महिना रोज किमान ८ किमी चालण्याची सवय करावी.
६) योग्य वयात आणि जनरल फिटनेस चांगला आहे तोवरच ही यात्रा करावी.
७)हि यात्रा दरवर्षी अक्षयतृतीयेला चालू होते व नरक चतुर्दशी पर्यंत चालू असते.
मे व जून, जुलै महिन्यात प्रचंड गर्दी असते,
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात गर्दी खूप कमी असते पण तिथे प्रचंड पाऊस ही असतो जो बरेचदा धोकादायक आणि विध्वंसक असू शकतो
ऑक्टोबर नोव्हेंबर ( निम्मा ) हे दिवस जरा त्यातल्या त्यात कमी गर्दीचे व योग्य असतात.
चारधाम अधिक उत्तराखंड अशी टूर कोणाला पाहिजे असल्यास, जॉयफुल जर्नीज तर्फे फर्स्ट हॅंड मॅनेजमेंटसह कस्टमाईज आयोजित करुन देण्यात येईल
Joyful Journeys
Contact
9637210130
9158750500
6006295770
At Delhi Airport
A Joyful Journey to Rajasthan
23 Feb to 4 March 2023
पधारो सा म्हारे देस
हि साद ऐकून आम्ही जॉयफुल मित्र मैत्रिणी राजस्थान जाऊन आलो .
सततच्या युद्धांनी ध्वस्त उध्वस्त पण महाराणा प्रताप यांचा पावनस्पर्श लाभलेला मेवाडही अनुभवला आणि
विलासी, आत्मकेंद्रित राजांचा, सतत मांडलिकत्व पत्करुन सुरक्षित अजूनही उत्तम राहिलेला मारवाडही बघितला..
मारवाडचे वैभव आज वादातीत आहे पण मनाला भावला तो उध्वस्त असूनही पराक्रमाच्या खुणा अंगावर मिरवणारा मेवाड !.
जैसलमेर वॉर मेमोरियल तर अफलातून!
राजस्थान हे विस्ताराच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे त्यामुळे एकाच फेरीत हे संपूर्ण बघणे शक्य होत नाही.
यासाठी थोड्या थोड्या कालावधीने दोन किंवा तीन वेळा जाणेच योग्य..
खाद्यपदार्थांची मात्र तेथे रेलचेल होती, एकंदरीत खूप चांगली खाद्यसंस्कृती आहे राजस्थान ची
बिश्नोई समाजाचे राहणीमान आणि पारंपारिकता पण अनुभवता आली जवळून पण हे लोक आता खूपच कमर्शियल झाले आहेत असेही जाणवले
मेहरानगड, चित्तोडगढ हे अवाढव्य किल्ले
सिटीपॅलेस, उम्मेद भवन हे राजनिवासस्थाने आणि पॅलेस हॉटेल्स
संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी ( दोनवेळा) मारलेली पिचोला लेकची बोटफेरी तर विसरणे अशक्य..
शॉपिंग साठी तर प्रचंड वाव आहे, फक्त जरा सावध पणे खरेदी करावी.
चला मंडळी तयारीला लागा पुढील राजस्थान टूर साठी 😀
अश्विनी राजगोळकर दंडगे
*Joyful Journeys*
9637210130, 6006295770, 9158750500
Please forward this post without making any changes to it 🙏🏼
जॉयफुल जर्नीज
२१ ऑगस्ट २०२२
मेघालय
ईशान्य भारतातील हे एक छोटेसे राज्य म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाकाच म्हणावे लागेल.
सेव्हन सिस्टर्स चा एक भाग असलेले हे राज्य आधी आसाम राज्यात होते.
२१ जानेवारी १९७२ ला मेघालय ला स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा मिळाला.
या राज्यात काय आहे बरं बघायला, अनुभवायला??
राज्याचा ७० टक्के भाग हा घनदाट जंगलच आहे
प्रचंड बायोडायव्हर्सिटी आहे इथे !
ब्ल्यू लगून असलेले असंख्य धबधबे आहेत.( पैकी नोहकलीकाई धबधब्याशी एक अतिशय करुण कथा जोडलेली आहे.😞)
खांसी,जैन्तिया आणि गारो आदिवासी संस्कृती, रबर प्लांटच्या नैसर्गिक मुळांना एकमेकांत गुंफून तयार केलेले लिव्हिंग रुट ब्रिजेस हि तर मेघालय ची खासियत!! ,
असंख्य प्रकारचे ऑर्किड आणि फुलपाखरे!!
निसर्गाने असं भरभरून दान दिलंय मेघालयला.
तिथं गेल्यावर या ओळी आपसूकच आठवतात
नभ उतरू आलं...
चिंब थरथरवलं...
माऊंलींगनोंग हे आशिया तील सर्वात स्वच्छ गावाचे पारितोषिक पटकावलेले गाव आपल्या मेघालयात आहे हे विशेष..
अलिकडे सोशल मीडिया वर गाजलेली पारदर्शक नदी उम्नगोत जी आशियातील सर्वात स्वच्छ नदी असल्याचा मुकुट मिरवते !
कोंगथोंग नावाचे ६०० लोकसंख्या असलेल्या गावात कुणाचेही नाव ठेवले जात नाही, तर बारश्याला बाळाची आई त्याच्यासाठी एक शीळ वाजवते.. ती शीळ म्हणजेच त्यांचे आयुष्यभराची ओळख असते.
एकमेकांना शीळ वाजवूनच बोलावले जाते हीपण एक गंमत आहे ना ?
मेघालयात मातृसत्ताक पद्धती चालते, लग्नानंतर नवरा सासरी जातो हे ऐकून तर समस्त भारतीय महिलांना विशेष आनंद होईल. कुटुंबाची संपत्ती आणि वारसा हा सर्वात लहान मुलीकडे जातो व तिलाच पालकांना सांभाळायची जबाबदारी ही पार पाडावी लागते.
अशा या आगळ्यावेगळ्या
मेघालयला कधी जावे ?
बेस्ट सिझन -- ऑक्टोबर ते डिसेंबर
मध्यम सिझन -- मार्च एप्रिल
झिम्माड पाऊस अनुभवायला -- मे, जून, जुलै, ऑगस्ट.
जानेवारी फेब्रुवारी महिन्यात प्रचंड थंडी असते
मेघालय साठी कस्टमाईज टूर अरेंज करुन देण्यात येईल, काझिरंगा अभयारण्याच्या टॉपिंग सह !
अश्विनी राजगोळकर
Joyful Journeys
Contact - 9637210130 , 6006295770 , 9158750500
Website - www.joyfuljourneys.co.in
लेख फॉरवर्ड करणार असाल तर कृपया त्यात कुठलाही बदल न करता लेखिकेच्या नावासहित फॉरवर्ड करावा ही नम्र विनंती
*जॉयफुल जर्नीज*
*३१ जुलै २०२२*
*सिक्कीम राज्य*
हे छोटुसे राज्य म्हणजे संपूर्ण पहाडी प्रदेशच आहे
गंगटोक ही राजधानी आहे
या राज्यात अजून स्वतः चे असे एअरपोर्ट पूर्ण विकसित झालेले नाही. त्यामुळे इथे जाण्यासाठी आपल्याला पश्चिम बंगाल च्या बागडोग्रा एअरपोर्ट किंवा एनजेपी रेल्वे स्थानक पर्यंत जाऊन मग तिथून पुढे गाडीत बसून गंगटोक गाठावे लागते, प्रवास अर्थातच सुंदर घाटांचा आहे
सिक्कीमचे वैशिष्ट्य आहे- रानफुले, ऑर्किड, धबधबे, असंख्य प्रकारचे पक्षी, बौद्ध संस्कृती मॉनेस्ट्रीज, चारधाम बारा ज्योतिर्लिंग यांची रिप्लिकेट मंदिरे एकाच जागी असलेलै सिद्धेश्वर धाम, काचेचा स्काय वॉक ब्रिज, भारतचीन बॉर्डर, लाचुंग सारखे अतिशय शांत सुरेख पहाडी गाव आणि तिथे पर्यंत पोचण्याचा अप्रतिम निसर्गसौंदर्य असलेला रस्ता, हिरवीगार झाडी आणि धबधबे !!! रोहडेंड्रॉन फुलांची घाटी, बर्फाच्छादित झिरो पॉईंट, त्सोग्मो लेक, कांचनजंगा ,पेलिंग ,बिक्सथांग.... बरीच यादी आहे
कधी जावे -
ऑक्टोबर, नोव्हेंबर-- थंडी कमी
मार्च, एप्रिल - जरा थंडी जास्त असते पण बर्फ जास्त मिळतो
मे , जून पहिल्या आठवड्यापर्यंत-- सगळ्यात उत्तम दिवस
कधी जाऊ नये -
जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर - पाऊस खूपच असतो
डिसेंबर जानेवारी -- थंडी खूपच असते, पण ज्यांना थंडी सहन होते आणि बर्फ वृष्टी पाहिजे असेल त्यांनी जावे
गंगटोक हे शहर वगळता अतिशय विरळ लोकवस्ती असलेले सिक्कीम हे खूप सुंदर राज्य आहे.
अतिशय समंजस आणि शिस्तबद्ध नागरिक आणि सेंद्रिय शेती हे सिक्कीम चे वैशिष्ट्य आहे...
येथे तुम्हाला एकही भिकारी दिसणार नाही.
कमालीची स्वच्छता दिसेल सगळीकडे !!
कितीही छोटे घर असले तरी दारात व सभोवताली सुंदर फुलझाडे असतीलच .
कोणीही ट्रॅफिक किंवा इतर कुठलेही नियम मोडत नाहीत, विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करत नाहीत...
कधी कधी शंका येते की नक्की आपण आपल्याच देशात आहोत का ते..😃
खंतही वाटते की हे शहाणपण संपूर्ण भारतात का नाही 😟
असो...
तर मंडळी अश्या या सुंदर राज्याचं पर्यटन हे एकदा केलंच पाहिजे... विचार करायला चालू करा..
डॉ अश्विनी राजगोळकर दंडगे
जॉयफुल जर्नीज
फोन नंबर - 9637210130, 6006295770, 9158750500
Website - www.joyfuljorneys.co.in
लेख फॉरवर्ड करणार असाल तर कृपया त्यात कुठलाही बदल न करता लेखिकेच्या नावासहित फॉरवर्ड करावा ही नम्र विनंती
यावर्षी जॉयफुल जर्नीज तर्फे, एकूण ८० जणांनी लदाख टूर केली.. काहीजण गृप टूर मधे सहभागी झाले तर काहींना वैयक्तिक कस्टमाईझ टूर अरेंज करुन देण्यात आली
सर्वांचेच मनापासून आभार
यावर्षी साठीचा आता लेह लडाख सिझन आता संपला आहे.
पुढील वर्षी पुन्हा २ गृप टूर असणार आहेत
एक मे महिन्यात आणि एक जून महिन्यात
याशिवाय कुणालाही स्वतंत्र पणे जायचं असेल तरीही तसं अरेंज करुन देऊ.
लदाख हा तसा खडतर प्रदेश आहे, त्याची स्वतःची काही चॅलेंजेस आहेत त्यामुळे शक्यतो सर्व साधारण फिटनेस बरा आहे तोवरच लदाख टूर करुन घ्यावी...
*जॉयफुल जर्नीज*
*२४ जुलै २०२२*
मंडळी, पर्यटन म्हणलं की त्याच्या प्रत्येकाच्या संकल्पना या वेगवेगळ्या असू शकतात, .
कुणाला एखाद्या गृपटूरसोबत जाणे जास्त सुरक्षित वाटते कारण याचे काही फायदे आहेत ,ते म्हणजे या टूरसोबत एक माहितगार टूर लिडर सोबत असतो, त्याशिवाय काही समवयस्क लोक सोबत असतात, नवनवीन मैत्र जोडले जाते.. सर्व टूरचे आयोजन नियोजन याची खात्री असते, कुठलाही व्याप पर्यटकाला स्वतः करावा लागत नाही
सर्व काही आखीव रेखीव असते, चुका टाळल्या जातात.
खाणे- पिण्याचे सेट मेन्यू ठरलेले असतात.
तर काही जणांना फक्त आपल्या कुटुंबातील लोकांसोबत अथवा ठराविक मित्रमैत्रिणींसोबत स्वतंत्रपणे वैयक्तिक टूर करायला आवडते.
यात मात्र स्वतः खूप माहिती घेणे, अभ्यास करणे , सर्व बुकींग करणे मग ते सगळं नीट खात्रीशीर होईल ना याबद्दल योग्य काळजी घेणे है सर्व व्याप कुणाला तरी पुढाकार घेऊन करावे लागतात.
पण या प्रकारात काही फायदे ही असतात, जसं की खाण्यापिणे चे मेन्यू सेट नसतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाहिजे तिथे ते पाहिजे तसं घेऊ शकता.
तुमच्या सोयीनुसार तुम्ही स्थलदर्शन करु शकता.
आम्ही या दोन्ही प्रकारचे नियोजन करतो
आमच्या गृपटूरचे कार्यक्रम हे कधीही धावपळीचे, गडबडीचे असत नाहीत, स्थलदर्शन कार्यक्रम हा विचारपूर्वक, निवांतपणे अनुभवता येईल अशी आखणी केलेली असतो.
जेवणाचे मेन्यू ही सर्व समावेशक असतात, काही स्थानिक पदार्थही समाविष्ट असतात
तर वैयक्तिक टूरही आम्ही तुमच्याशी चर्चा करुन, तुमच्या आवडीनुसार, सवडीनुसार, बजेटनुसार, पूर्ण जबाबदारीने अरेंज करुन देतो म्हणजे तुम्हाला एक खात्रीशीर व्यवस्था कुठलाही त्रास न होता करुन मिळते, हि टूर सुरवातीपासून शेवटपर्यंत आम्ही रोज आखणी नुसार होईल ही सर्व व्यवस्था बघतो.
डॉ अश्विनी राजगोळकर दंडगे
जॉयफुल जर्नीज
फोन - 9637210130. ; 6006295770, 9158750500
Website -
www.joyfuljourneys.co.in
हा लेख फॉरवर्ड करणार असाल तर कृपया त्यात कुठलाही बदल न करता लेखिकेच्या नावासहित फॉरवर्ड करावा ही नम्र विनंती 🙏🏼
Tour & Travel Consultants
*जॉयफुल जर्नीज*
*१०जुलै २०२२*
अंदमान निकोबार द्वीपसमूह हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. या बेटांची संख्या एकूण ५७२ आहे. यापैकी २२ बेटांवर मानवी वस्ती आहे तर ३६ बेटांवर माणूस जाऊ शकतो. मात्र निकोबार प्रदेशात फक्त रिसर्च, सर्वे करणाऱ्या विशेष लोकांनाच जाता येते. पर्यटक तेथे जाऊ शकत नाहीत .अंदमान निकोबार बेटांवरील अनेक जागा अजूनही अशा आहेत जिथे मनुष्य अजून पोचू शकला नाहीये. अंदमान बेटे ही भारतापासून ८० टक्के अंतरावर आहेत तर इंडोनेशिया थायलंड यापासून जवळ म्हणजे २० टक्के अंतरावर आहेत .
अंदमान बेटे व भारत यांच्यामध्ये बंगालचा उपसागर आहे तर इंडोनेशिया आणि अंदमान यांच्यामध्ये पूर्व अंदमान समुद्र आहे
अंदमान बेटांच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे.
भारताशी अंदमानचा असलेला संबंध आपल्याला अकराव्या शतकात आढळून येतो. इसवीसन १०१४ ते १०४२ या कालावधीत चोल राजघराण्यातील तमिल राजा राजेंद्र चोल याने अंदमान येथे पहिला आरमारी तळ उभारला होता. त्या नंतर बाराव्या तेराव्या शतकात डेन्मार्कचा एक प्रवासी मार्कोपोलो इथे येऊन गेल्याचे उल्लेख आहेत .इंग्रज अंदमानात दाखल झालेले इसवी सन १७८९ मध्ये .त्यानंतर त्यांनी इथे आरमारी तळ व कॉलनी उभारल्या .सेल्युलर जेल १९१० साली बांधून पूर्ण झाले. या कालावधीमध्ये पोर्ट ब्लेअर येथे सर्व बांधकाम मजूर कैदी यांची वस्ती होती तर सर्व ब्रिटिश ऑफिसर व उच्चवर्गीय यांची राहण्याची व्यवस्था रॉस आयलंड येथे होती ,जे आताचे आपले नेताजी आयलँड होय. दुसऱ्या महायुद्धात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेने मार्फत जपानला इंग्लंड विरुद्ध जी काही मदत केली त्याबद्दल अंदमान बेटे आझाद हिंद सेनेला मिळाली होती.*३० डिसेंबर १९४३ रोजी* *सुभाषबाबूंनी येथे तत्कालीन भारतीय ध्वज नेताजी बेटावर फडकविला होता*
डॉ अश्विनी राजगोळकर दंडगे
जॉयफुल जर्नीज
फोन - 9637210130,.and 6006295770, 9158750500
*लेख फॉरवर्ड करणार असाल तर कृपया त्यात कुठलाही बदल न करता, लेखिकेच्या नावासहित फॉरवर्ड करावा ही नम्र विनंती*
जॉयफुल जर्नीज
३ जुलै २०२२
सुप्रभात 🙏🏼🙏🏼
पर्यटनासाठी निघायचं तर मुख्य प्रश्न येतो तो कुठं आणि केव्हा जावं.
मग यावर दोन पर्याय आहेत
एक म्हणजे जिथे जायचे आहे तिथला उत्तम सिझन असेल तेव्हा आपण वेळ/सुट्टी काढून तिथे जाणे.
दुसरा पर्याय म्हणजे आपल्याच सुट्टीत जायचं असेल तेव्हा जिथला उत्तम सिझन असेल तिथे जाणे.
उदाहरणार्थ उन्हाळी सुट्टीत एप्रिल मे महिन्यात चाललाय तर मग काश्मीर किंवा सिक्कीम जावे.
दिवाळी सुट्टीत राजस्थान किंवा मेघालय जावे
त्याअनुषंगाने भारतीय पर्यटनाच्या एकेका भागाची थोडी थोडी माहिती द्यायला चालू करत आहोत.
*अंदमान*
कधी जावे ?
-नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात जावे , त्यातही जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने जास्त उत्तम!!
मे ते सप्टेंबर महिन्यात अजिबात जाऊ नये कारण पावसाळ्यात सर्व समुद्री वाहतूक बंद असल्याने बर्रयाच बेटांवर जाण्याची परमिट मिळू शकत नाहीत , मग अशा वेळी बरेचदा फक्त पोर्ट ब्लेअर, नेताजी बेट( रॉस), नॉर्थ बे बेट एवढंच बघून परत यावे लागते.
तसेच समुद्राचा सुंदर पाचूसारखारंगही ढगाळ हवामानामुळे दिसून येत नाही.
स्नॉरकेलींग स्कुबा हे सगळं ही पावसाळ्यात बंद ठेवतात..
अंदमानात मे व डिसेंबर महिन्यात बरेचदा समुद्री वादळं येतात तेव्हा ही हे सर्व अचानक पणे बंद होऊ शकते.
अंदमान हा बेटांचा समूह आहे , येथे रोज एका बेटावर जायला स्पीडबोट किंवा क्रुजनेच जावे लागते.
बर्याच ठिकाणांना भेट देण्यासाठी वनविभाग, आर्मी आणि जनरल रोड परमिट काढावे लागते.त्याशिवाय मग परमिट मिळाले की त्याच दिवशीचे स्पीडबोट तिकीट ही मिळवावे लागते.
अंदमान येथे एक जोली बोय आयलंड नावाचे अप्रतिम सुंदर बेट आहे , येथे रोज फक्त ७५ जणच जाऊ शकतात.हे एक अप्रतिम असे नैसर्गिक समुद्री अभयारण्य आहे.
बॅरन आयलंड येथे जिवंत ज्वालामुखी आहे पण येथे पर्यटक जाऊ शकत नाहीत
पॅरट आयलंड येथे रोज संध्याकाळी हजारो रंगबेरंगी पोपट येतात रात्रभर मुक्काम करतात आणि सकाळी उडून जातात.
अशी अनेक रहस्यं आहेत अंदमानच्या परिसरात!!
अश्विनी राजगोळकर दंडगे
Joyful Journeys
9637210130, 6006295770
9158750500
लेख फॉरवर्ड करणार असाल तर कृपया आहे तसा , आहे त्या स्वरूपात , लेखिकेच्या नावासहित फॉरवर्ड करावा ही नम्र विनंती 🙏🏼
*Joyful Journeys*
*26June 2022*
आपला भारत देश हा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.
आपलाच देश जर आपण नीट समजून घेऊन बघितला तर सर्व प्रकारचा निसर्ग, भूरुपे, संस्कृती, उत्सव, खानपान यातील विविधता हि अक्षरशः भारावून टाकणारी आहे.
यासाठी आवश्यक आहे ते त्या त्या भागातील उत्तम सिझन मध्येच तिथे भेट देणे.. वेळ काढून जाणे आणि तो प्रदेश फक्त पर्यटक म्हणून बघणे नाही तर अनुभवणे..
यासाठी आम्ही आहोत तुमच्या साठी... योग्य माहिती, सल्ला आणि इतरही सर्व मदत करायला..
आपल्या कडे आखाती देशांच्या तोडीची सॅंडड्यून्स आहेत, सदाहरित जंगले आहेत, अंदमान लक्ष्य द्वीप सारखे स्वच्छ निर्मळ कमी गर्दी चे समुद्र किनारे आहेत
ओरिसा, मध्य प्रदेश, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र, राजस्थान,आसाम हि समृद्ध वाईल्ड लाईफ डेस्टीनेशन्स आहेत
मेघालय सिक्कीम सारखी युरोपच्या तोडीची ठिकाणे आहेत.
अतिशयोक्ती नाही पण मेघालय चे बांबूट्रेल, ब्ल्यू लगून वॉटरफॉल, नॅचरल रुट ब्रीज, ट्रान्सप्लांट उम्नगोत नदी यांचे फोटो व्हिडिओ बघून माझी युरोप मध्ये राहणारी एक मैत्रीण प्रभावित झाली..आणि नेक्स्ट इंडिया व्हिजिटला मेघालय जायचं हा तिचा पक्का निर्धार झालाय..😊..
आर्य, हिंदू,जैन, बौद्ध संस्कृती आणि स्थापत्य शैलींचा उत्तम मिलाफ आपल्या कडे आहे.
अनेक साम्राज्ये आणि त्यांच्या पाऊलखुणा आपण अभिमानाने मिरवतोय .
हे सगळं टप्प्याटप्प्याने का होईना अनुभवलेच पाहिजे..
डॉ अश्विनी राजगोळकर
जॉयफुल जर्नीज
9637210130
6006295770
9158750500
** माहिती व लेख फॉरवर्ड करणार असाल तर कृपया काहीही बदल न करता, आहे त्या स्वरूपातच फॉरवर्ड करावा ही नम्र विनंती 🙏🏼
*सुप्रभात आणि नमस्कार मित्रांनो*🙏🏼🙏🏼
*मी डॉ अश्विनी राजगोळकर*
*व्यवसाय- डॉक्टर.*
आवड- प्रवास, नवनवीन मैत्र जोडणे, ट्रेकिंग*
*प्रवास कंपनी चे नाव -- Joyful Journeys*
*Email id* -- [email protected]
*Website* -
www.joyfuljourneys.co.in
*या आवडीतूनच साल २००२ पासून टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारत भ्रमण केले आणि या छंदातूनच २०१७ साली आप्तस्वकीयांसाठी पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्यात अंदमान आणि एप्रिल महिन्यात काश्मीर अश्या २ गृप ट्रीप नियोजन करून, स्वतः सोबत जाऊन पार पाडल्या*
*हे नियोजन आणि प्रामाणिक काम लोकांना हळूहळू खूप आवडतं गेले आणि यातूनच गेल्या ६ वर्षांत*--
१५ अंदमान गृप टूर, ८ लेह लडाख गृप टूर , ८ काश्मीर ट्रीप, सिक्कीम टूर, राजस्थान टूर, मेघालय काझिरंगा टूर उत्तम रितीने पार पडल्या
याशिवाय कितीतरी कस्टमायझेशन टूरही आम्ही अरेंज करुन दिल्या... हिमाचल, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात..
*अगदी कोविड काळात रद्द झालेल्या टूर्स चे आम्ही १०० टक्के रिफंडही केले आणि जपली विस्वासार्हता*..
आपल्या या गृप वर दर रविवारी भारत आणि पर्यटन या विषयावर थोडी माहिती पोस्ट करत जाईन.
कृपया ती वाचावी ही नम्र विनंती..
डॉ अश्विनी राजगोळकर
जॉयफुल जर्नीज
9637210130
6006295770
9158750500 ( Manish Rajgolkar)
Tour & Travel Consultants
डॉ. अजय शिंदे, कोल्हापूर
सर्वप्रथम आपल्या सर्वांच अभिनंदन व कौतुक........ खरतर लेह, लडाख ट्रीप ही फक्त काही गंमत व मजा करायची ट्रीप नाही. आपल्या सगळ्यांचा मानसिक, शारीरिक अंतिम पातळीची परीक्षा पाहणारी ती ट्रीप होती. मात्र काही वेगळा करायचं असेल, बघायचं असेल तर थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. निसर्गाच्या अद्भुत रचना आणि थोर दैवी कमाल असे या ट्रीपचे वर्णन करता येईल. आभाळाला टेकेल असे उंच डोंगर पर्वत, सुंदर स्वच्छ हवा व आरशासारखे पारदर्शक व नितळ आभाळ .पेंगाँग तर कल्पनातीत .आपल्या ग्रुपमध्ये वीस, बावीस वर्षाच्या मुलांपासून ते 60 ते 65 वर्षापर्यंतच्या तरुण-तरुणींची🙂 रेलचेल होती. विशेष कौतुक कुलकर्णी आणि शिरगुप्पे यांचे. वयाच्या या टप्प्यावर त्यांचा उत्साह आम्हाला व इतरांना लाजवेल असा. काही किरकोळ त्रुटी वगळता सर्व नियोजन अतिशय सुंदर. हॉटेल, जेवण तर वीना वर्ल्ड या ब्रँड ग्रुप एवढेच उत्तम. एक हाती सर्व कारभार अश्विनी मॅडम ने खूप उत्साहाने व जबाबदारीने पार पाडले. अगदी कालचे मध्यरात्रीचे जेवण देखील खूपच चवीचे अर्थात😌😌 खूप भूक लागली होती हे देखील तेवढेच. आपल्या टीम मधील गडहिंग्लज ग्रुपने🙋🏼♀️🙋🏼♀️👩🦰💃🏽💃🏽🙋🏼♀️🙋🏼♀️🙋🏼♀️ जेवणा मधील लोणचे, पापड, कोशिंबीर व भजी सारखे खमंग ...चटकदार चव आणण्याचे महत्त्वाचे काम केले .त्यांच्या असण्याने ट्रीप मध्ये जिवंतपणा आला. खळखळता उत्साह म्हणजे काय व आयुष्य अधून मधून असेही जगले पाहिजे याचे जाणीव करून देणार. आपला पूर्ण प्रवास ज्यांच्यावर अवलंबून होता अशी तीन मंडळी म्हणजे आपल्या ड्रायव्हर व त्यांनी व्यवस्थित राखून ठेवलेल्या त्यांच्या गाड्या .आमच्यातर्फे त्यांचे विशेष आभार .खरेतर शेवटच्या दिवशी लेहमध्ये सर्वांच्या वतीने त्यांना रोख रक्कम देऊन त्यांचे आभार मानाव अशी इच्छा होती परंतु वेळेअभावी ते जमले नाही.
Kashmir Tour Travel Blog by Mrs. Rajashri Joshi (Kolhapur) :
IIश्रीII
"काश्मीरास जावे नित्य वदावे", अशीच माझी स्थिती होती पण योग येत नव्हता हा योग जुळवून आणला मनीष आणि अश्विनी यांनी .
काश्मिर ट्रिप ची तारीख ठरल्यानंतर रोजचे आलेले अश्विनी चे मेसेजेस वाचून खरेदी करणे, डॉक्युमेंट तयार ठेवणे, या धावपळीत वेळ कसा गेला समजलेच नाही.
"आता काय तुम्ही कश्मीर ला जाणाऱ" या वाक्याने आनंदात भरच पडत गेली.
अखेर श्रीनगर ला जाण्यासाठी विमानाने उड्डाण केले. ✈️ जसे जसे श्रीनगर जवळ आले तसे पर्वतरांगांचे मुकुट दिसू लागले. 👑🌫️ जणू या नंदनवनाचे ते सम्राट.
शिकारा, वेगवेगळ्या रंगांची फुले, बागा, व्हॅली, बर्फ, चिनार वृक्ष, कावा, ग्लेशीयर मध्ये मध्ये संरक्षणासाठी उभे असलेले जवान, झेलमचे खळखळणारे पाणी, केशरचे मळे, सफरचंदाच्या बागा आणि मस्त थंडीची दुलई यांनी भरलेले कश्मीर एक सुखद अनुभव.
सूर्य मंदिर प्रचंड ऊर्जा देऊन गेले. अमरनाथ च्या पहिल्या पायरी समोर नतमस्तक होताना मन भरून आले 🙏🏻सिंधू नदीचे खळाळते पाणी बघून आम्ही खूष झालो. हे सगळे सुंदर सुंदर अनुभवत असताना शाल, स्वेटर, ड्रायफ्रुट्स, जॅकेट, साड्या, इत्यादीची खरेदी संपतच नव्हती.. अर्थातच हा अनुभव अश्विनीला नवीन नव्हता😀😀.काश्मिरी ड्रेस घालून थोडावेळ मी शर्मिला टागोरच्या अविरभवात वावरले💃🏻😍. आता बॅगचे वजन एअरपोर्टवरती किती होईल याची चिंता लागली होती. पण हृदयाच्या कप्प्यात साठवलेल्या रम्य आठवणींना ना वजनाची चिंता ना मोजमाप. कुटुंबातील वडीलधारी मंडळी आपल्याला निरोप देताना, "पुन्हा या ,सावकाश जा" असे म्हणतात तसेच या पर्वत रांगा आम्हाला निरोप देत होत्या. डोळे पाणावले होते, परंतु परत तर यायलाच हवे होते. ही काश्मीर ट्रिप मनाला खुपच उभारी देऊन गेली. या गोल्डन मेमरीज सदैव आपल्या सोबत राहतील आणि मैत्रीचे नाते हे अबाधित राहील .
पण हे सर्व अनुभवताना मनीष आणि अश्विनी ला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच .
शेवटी काश्मिरी भाषेत एवढेच म्हणेन
" काश्मीर छु वारिया असा"
म्हणजेच काश्मीर खुप सुंदर आहे, आणि याला आपण सर्व सहमत असणारच.
सौ राजश्री जोशी
Joyful Journeys
Amazing Kashmir Tour by Joyful Journeys : 15 - 22 April, 2022
SIKKIM - Group Tour
10th May to 20th May, 2022
LEH & LADAKH
Experience Spirituality & Adventure !
Group Tour - 10 to 18 June 2022
Monsoon Beauty - AMBA
(05 Sept. 2021)
Review from Smt. Sunita Sagaonkar about our Kashmir-Ladakh Tour July 2019.
(Courtesy - Daily Maharashtra Times, Kolhapur Edition)
नमस्कार !
लेह लदाख च्या या Joyful Journey ची मूळची आखणी झाली होती ती 25 मे ते 4 जून 2020 साठी.
तेव्हा आम्ही एकूण 34 जण जाणार होतो, पण मार्च 2020 ला लॉक डाऊन लागला आणि सर्वकाही बारगळले ! ही परिस्थिती निवळायला जानेवारी 2021 उजाडले. आम्ही काढलेल्या विमान तिकिटांचे रिफंड मिळायला सुरुवात झाली. अर्थात हा रिफंड मिळवायलाही बरीच यातायात करावी लागली. त्यानंतर सर्व ग्रुपशी चर्चा झाल्यावर असे ठरले की आपण जाणे रद्द करायचे नाही तर 25 मे ते 4 जून 2021 ला जाऊयात. त्यानुसार पुन्हा 34 तिकिटे बुक केली. सगळी मंडळी उत्साहात ! पण पुन्हा एप्रिल दरम्यान दुसरी लाट सुरू झाली आणि इकडे सर्वांच्या मनात धाकधूक? जायला मिळते की नाही ? तेवढ्यात मे महिन्यात लदाखलाही कोविड कर्फ्यू लागला आणि परत विमान तिकिटे रद्द करावी लागली. 34 तिकिटे पुन्हा एकदा रद्द करून रिफंड मिळवण्याची कसरत पार पाडली. तरीही आम्ही २५ जण मात्र अजूनही आशा टिकवून होतो की या वर्षी लेह लदाखला जायचेच. पण तिथला कर्फ्यू तर संपला पाहिजे
आता मात्र आम्ही 35 जणांपैकी ज्यांना यायचे नाही त्यांना तसा निर्णय घ्यायला सांगितला आणि त्यानुसार ज्या ७ जणांनी येणे रद्द केलं. त्यांना त्यांची भरलेली पूर्ण रक्कम रिफंड केली.
उरलेल्या 27 जणांची प्रतीक्षा सुरू झाली ती लदाखकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची. ७ जून २०२१ पासून हळूहळू लदाख मधील निर्बंध सैल होऊ लागले. आम्ही लक्ष ठेवून होतोच. दर सोमवारी नवीन पत्रकाची वाट बघत होतो.
21 जून 2021 ला अखेर आम्हाला पाहिजे तसे घडलेच.
इच्छा तेथे मार्ग !
लदाख टुरिस्ट साठी पूर्णपणे उघडले, अर्थात RT-PCR निगेटिव्ह रिपोर्टची अट होतीच. पण ती अट त्यांनी सुरुवातीपासूनच सर्वांसाठीच म्हणजेच अगदी बाहेर प्रांतातून परत लदाखमध्ये येणाऱ्या लदाखी लोकांसाठीही ठेवल्यानेच मला वाटते की आज घडीला लदाख हा देशातील कोविड दृष्टिकोनातून सर्वात सुरक्षित भाग आहे.
आता आम्ही सत्तावीस जणांनी 24 जून 2021 ला RT-PCR टेस्ट केली. सुदैवाने सर्वच्या सर्व जण निगेटिव आलो. त्यानंतर 25 तारखेला रात्री सर्वांची मुंबई लेह 27 जून रोजीची विमान तिकीटे बुक केली आणि अखेर आम्ही 27 लदाख प्रेमी 27 जून ला सकाळी सव्वा सहा वाजता लेह विमानतळावर उतरलो.💃🏻
त्यानंतर 27 जून ते 5 जुलै या कालावधीत आम्ही लेह, कारगिल, द्रास, नुब्रा व्हॅली, खारदुंग ला पास ,नामीक ला पास, फटू ला पास ,चांग ला पास, पेंगोंग लेक, श्योक व्हॅली, नुब्रा व्हॅली, कारगिल व्हॅली आणि स्नोफॉल ही सर्व धमाल कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळूनच केली हं !
कौतूक करावे ते लदाखी माणसाचे. प्रत्येकजण काटेकोरपणे मास्क वापरत होते. कारण विचारल्यास उत्तर मिळाले 'मेरी वजहसे मेरा लद्दाख मुश्किल मे नही पडना चाहिये' मी दोन मिनिटं स्तब्ध झाले.
हे कधी बरं घडावं आपल्याकडे ?
शिकलं पाहिजे हे लदाखी माणसाकडून !
डॉ अश्विनी राजगोळकर दंडगे
Joyful Journeys
Glimpses of our very recently concluded A Joyful Journey to Leh & Ladakh !
(Jun 27 - July 05, 2021)
176, Sanchit, R. K. Nagar, Mool Society, Morewadi
Kolhapur
416013
Monday | 10am - 6am |
Tuesday | 10am - 6am |
Wednesday | 10am - 6am |
Thursday | 10am - 6am |
Friday | 10am - 6am |
Saturday | 10am - 6am |
Be the first to know and let us send you an email when Joyful Journeys posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Send a message to Joyful Journeys: