Guhagar

Guhagar Guhagar is a census city in Ratnagiri district in the Indian state of Maharashtra.

Guhagar is known for its virgin beach, coir items, coconuts, betel nuts and mainly Haapus Alphonso mangoes मुंबईहून किंवा पुण्याहून कुंभाली घाटाने चिपळूण गाठायचं. चिपळूणहून तासाभरात येतं गुहागर. या प्रवासाला फक्त सहा ते सात तास लागतात. गुहागर पाहायला सुरुवात करायची ती गोपाळगडापासून, अंजनवेल गावातून पायरस्त्याने किंवा थेट गाडीरस्त्याने गोपाळगडावर जाता येतं. या गडावरून वशिष्ठी नदीच्या मुखावर वसलेलं

दाभोळ बंदर आणि तिथून चिपळूणपर्यंत ये-जा करणारी मालवाहू जहाज यावर प्राचीन काळी व ऐतिहासिक कालखंडातही नजर ठेवली जात असे. भक्कम बारा बुरुज, विहिरी व पडक्या इमारतीचे अवशेष किल्ल्यात आजही पाहायला मिळतात. किल्ल्यावरून समुद्र व खाडीचं होणारं दर्शन विलोभनीय आहे.
गोपाळगड पाहून परत गुहागरला येताना वरच्या पाटामध्ये दुर्गादेवीचं मंदिर आहे. देवीची मूर्ती संगमरवराची आणि अष्टभुजा असून ती महिषासुराचं मर्दन करीत आहे. मंदिरासमोर पुष्करणी म्हणजे छोटा तलाव आहे. मंदिराचं प्रवेशद्वार भव्य व आकर्षक आहे. वरच्या पाटातून देवपाटात आल्यावर उफराटा गणपती मंदिर आहे. त्याबद्दलची आख्यायिका अशी..
समुद्राचं पाणी वाढून त्यात गुहागर बुडून जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी श्री गणेशाने आपलं तोंड समुद्राकडे, म्हणजे पश्चिमेकडे वळवलं आणि समुद्र शांत झाला. मात्र नाव उफराटा असं असलं, तरी गणेशमूर्ती सुबक संगमरवरी आहे.
श्री व्याडेश्वर हे गुहागरचं आद्य दैवत. हे शिवपंचायतन आहे. मंदिर परिसरात गणपती, विष्णू, सूर्य व श्रीदेवी यांची मंदिरं आहेत. मंदिराचा रंग राखाडी आहे.
गुहागरच्या पुढे पालशेत हे अतिप्राचीन गाव आहे. पालशेतहून निवोशीकडे जाणा-या रस्त्याने घाट चढून गेल्यावर सुसरोंडीची गुहा पाहता येते. 2001 साली झालेल्या उत्खननात येथे दगडी अवजारं सापडली. त्यावरून ही गुहा 90 हजार वर्ष इतकी जुनी असल्याचा निष्कर्ष पुरातत्त्ववेत्त्यांनी काढला आहे. सुंदरी नदीच्या धबधब्याच्या बाजूने उतरून नदी ओलांडून गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ जाता येतं.
पालशेतमध्ये १६व्या शतकापर्यंत अस्तित्वात असणा-या बंदरांचे अवशेषही सापडले आहेत. जांभ्याच्या दगडामध्ये बांधलेल्या बुरुजांचा तर व पायऱ्या याची साक्ष देतात. याशिवाय पालशेतमध्ये पुरातन सागरी मार्गाच्या खुणा आहेत. इ.स. पूर्व दुस-या शतकात सम्राट अशोकाच्या काळी किनाऱ्यावरच्या कोकणातल्या बंदरांना जोडणारा महामार्ग अस्तित्वात होता, असं पुरातत्त्ववेत्त्यांचं मत आहे.
पालशेतहून पुढे जाताना वेळणेश्वर लागतं. वेळणेश्वरच्या टेकडीवरून रस्ता उतरताना समुद्राचं सुंदर दर्शन होतं. समुद्रकिनाऱ्यावरला वा वेळागरवरला देव म्हणजे वेळणेश्वर. मंदिर परिसरात कालभैरव, विष्णू आणि गणपती मंदिर आहे. वेळणेश्वर मंदिराचं स्थापत्य अनोखं आणि विशेष आहे. माघ महिन्याच्या महाशिवरात्रीस इथे मोठा उत्सव असतो.
वेळणेश्वरहून सहा किमीवर हेदवी आहे. येथील दहा हातांचा श्री दशभूजा गणपती प्रसिद्ध आहे. टेकडीच्या कडेला असलेलं मंदिर आणि दीपमाळ आकर्षक रंगात रंगवलेली आहे. श्री गणेशाचं दर्शन व मंदिर परिसर अतिशय प्रसन्न आहे. हेदवीला आणखी एक रम्य ठिकाण पाहण्यासारखं आहे, ते म्हणजे बामणघळ. हेदवी किना-यावर उमा महेश्वर मंदिराशेजारी खडकात किना-यावर वरून येणा-या पाण्याने व सागरी लाटांनी ही घळ तयार केली आहे. समुद्राच्या लाटांचं पाणी यात घुसतं. भरतीच्या वेळी त्याचा फवारा उंच उडतो. ही गंमत पाहण्यासारखी आहे; पण दूरूनच!


हेदवीच्या दक्षिणेस तवसाळ गावचा नयनरम्य किनारा आहे. शास्त्री नदीच्या खाडीमुखावर जयगडचा जोडीदार विजयगडचा किल्ला तवसाळ गावात पाहावयास मिळतो. गुहागरच्या परिसरात येण्यासाठी दाभोळ-धोपावे, काताळे, सैतवडे अशी फेरीबोट सेवाही उपलब्ध आहे. गुहागरमधील असलेली, बुधल, नरवण, शीर, मरळ, कोंड, कारूंळ अशी अनेक पर्यटनस्थळं पाहायची असतील तर किमान पाच-सहा दिवसांचा मुक्काम करावयास हवा. येथील डेरवण व परशुरामाचं मंदिरही पाहण्यासारखं आहे

तुम्हांला माहितीय का आज ‘जागतिक फणस दिन’ आहे... चक्रावलात असाही काही दिवस असतो म्हणून. फणसाचा समावेश पूर्णान्न कॅटेगरीमध...
04/07/2023

तुम्हांला माहितीय का आज ‘जागतिक फणस दिन’ आहे... चक्रावलात असाही काही दिवस असतो म्हणून.

फणसाचा समावेश पूर्णान्न कॅटेगरीमध्ये होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीनेही फणस उत्तम आहे. जीवनसत्त्व अ आणि क, फायबर (तंतू) ठासून भरलेला फणस पोटभरीच फळ आहे. दुपारच्या जेवणात फणसाची दीड-दोन वाट्या भाजी खाल्लीत तर रात्री तुम्हांला अगदी हलकी भूक लागेल. त्यामुळे मधुमेही किंवा वजन कमी करणाऱ्यांकरता फणस एक चांगला पर्याय आहे. यात पोटॅशियम आहे. शरीरातलं सोडियम आणि द्रव पदार्थांचं प्रमाण नियमित करतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. एंटीऑक्सिडंट असल्यामुळं फणस कॅन्सर प्रतिबंधक आहे. फणसाची मूळं जमिनीत खोलवर जात असल्यामुळं जमिनीत खोलवर असणारे क्षार आपल्याला गऱ्यांमधून मिळतात. फणसाच्या टेक्स्चरमुळं हल्ली मांसाहाराला पर्याय म्हणूनही कच्च्या फणसाचा वापर केला जातोय. नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादकांमधील जागरुकतेमुळं कोकणात आणि केरळमध्ये गेल्या काही वर्षात फणसक्रांतीला सुरूवात झालीय. केरळमध्ये श्रीकृष्ण पद्रे नावाचे वरिष्ठ कृषी पत्रकार देशभरातील फणस उत्पादक शेतकरी आणि देशाबाहेरील उद्योग यांच्यातला दुवा आहेत. त्यांच्या भरीव कामगिरीमुळं केरळ सरकारनं त्यांची केरळचे फणस राजदूत म्हणून नेमणूक केलीय. 20 वर्ष वयाच्या फणसाच्या झाडाचं लाकूड सर्व प्रकारच्या फर्निचरकरता, घराच्या बांधकामाकरता उत्तम आहे. नारळापेक्षाही किंचीत जास्तच गुण फणसामध्ये आहेत.. त्यामुळं फणसही कल्पवृक्षच आहे.

आपल्या देशात फणसाचं मूळ आहे. पण गेल्या काही वर्षांपासून दक्षिण आशियाई देशांमध्ये फणसाचं उत्पादन आणि लागवड झपाट्यानं वाढत आहे. व्हिएतनाम फणसप्रक्रिया उद्योगात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका, जपान, जर्मनी, रशिया आणि चीन या देशांना व्हिएतनाम फणसाचे चीप्स निर्यात करतं. व्हिएतनामच्या या उद्योगांना वर्षाला शंभर हजार टनांपेक्षा अधिक फणस लागतात. अगदी थायलंड, आफ्रिकेच्या काही भागात आणि मेक्सिकोमध्येही मुख्य पिक म्हणून फणसाची लागवड करण्यात येतेय. पण अजूनही भारतात व्यावसायिकदृष्ट्या फणसाचा फारसा विचार केला जात नाही. तामिळनाडूतल्या पनरुत्तीमध्ये वर्षभर फणस मिळतो. सहकारी संस्थेच्या माध्यमातून फणसाची व्यावसायिकरित्या लागवड करण्यात येते. इथं 70-80 किलो वजनाचेही फणस मिळतात. पनरुत्ती आणि कर्नाटकच्या तुबगेरेमधून व्हिएतनामला फणस निर्यात करण्यात येतात. ईशान्य भारतातही फणस चांगलाच लोकप्रिय आहे. नुकतंच शिलाँगमध्ये स्मोकी जॅक या कंपनीला आठळ्यांपासून जॉकलेट बनवायला व्यावसायिक परवानगीही मिळालीय. या जॉकलेटमध्ये कोको आणि दूध पावडर नाहीये.

कच्च्या फणसाची भाकरी बनवता येते. साधारण 2 लीटरचं भांडं भरून कोवळ्या फणसाचे गरे घ्यायचे. कोवळ्यामध्ये तर आठळ्या नसतातचं. गरे बारिक वाटायचे. या पेस्टमध्ये, 2 कप तांदूळ भिजवून बारिक वाटून मिसळायचे. वाटायला लागेल इतपतच पाणी घालायचं. भाकरी थापता येईल एवढचं सैलसर पीठ हवं. केळीच्या पानात भाकरी थापून मग पानासकटच भाकरी गरम तव्यावर टाकायची. पानाकडील बाजू वरती. खालून भाकरी शेकू लागली की वरून पान आपोआप सुटून येतं. मग उलथून दुसऱ्या बाजूनं शेकवायची.

कच्च्या फणसाची बिर्याणी, कबाब, पॅटिस तर बनवतातचं पण कोवळ्या फणसाचा चक्क बटाटावडाही बनवतात. च्यॅवम्यॅव खाऊ किंवा स्टार्टर्समधला हा एक नवा ऑप्शन आहे.

आपल्याला हे कच्चे गरे टिकवताही येतात. आठळ्या काढलेले कच्चे गरे एका बरणीत भरा आणि त्यात जाडं/खड्याच मीठ घाला. आठवडाभर दिवसातून एकदा हे खालीवर हलवा. मीठाला पाणी सुटू लागत. झाकण घट्ट लावून फडताळात बरणी ठेवा. हे कच्चे गरे सहा महिने टिकतात. हवं तेव्हा गरे काढा. स्वच्छ धुवून घ्या मग एक दिवसभर साध्या पाण्यात भिजत घाला म्हणजे अतिरिक्त मीठ निघून जाईल. आणि मग हवा तो पदार्थ बनवा. अगदी भाजीही. या टिकवलेल्या गऱ्यांच्या पेस्टमध्ये ओलं खोबरं, जीर वाटून घालायचं. पाणी नाही घालायचं. गोळा होईल इतकी तांदूळाची पीठी घाला. तेलाचा हात लावून लहान बोराएवढे गोळे करा आणि कढईत सोडा. सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत तळा. थोडे कुरकुरीत कडक असतात पण येताजाता तोंडात टाकायला, टाईमपासकरता छान.

सर्वसाधारणपणे आपल्याकडे उडीद, तांदूळ, ज्वारी, नाचणी, पोहे याचे पापड बनवले जातात. पण तुम्हांला आश्चर्य वाटेल फणसाचेही पापड बनवतात. छान पाऊस पाहत खोबरेल तेलात तळलेला फणसाचा पापड त्यावर ओलं खोबरं,साखर पेरलीय आणि फिल्टर कापी (कॉफी). आहाहा, पावसाळ्यात गावी असं रिलॅक्स करायला मला खूप आवडतं. हा पापड भाजूनही छान लागतो. आपल्या आवडीनुसार जेवणात, संध्याकाळच्या टाईमपास खाण्यात तळून, भाजून कसाही एन्जॉय करा. फणसाच्या पापडाकरता कच्चा फणस लागतो. बिया काढून कच्चे गरे वाफवून घेणे. अंदाजे मीठ घालून हे वाफवलेले गरे चेचायचे. हवं असल्यास थोडं तिखट आणि जिरं घाला. या चेचलेल्या लगद्याचे लिंबाएवढे गोळे करा. या गोळ्याला अगदी थेंबबर तेल सगळीकडून लावा. पोळपाटावर प्लॅस्टिक ठेवा त्यावर हा गोळा ठेवा, वरून आणखी एक प्लॅस्टिक ठेवा, मग या गोळ्यावर एखाद्या सपाट वस्तूने/झाकणाने दाब द्यायचा. पण आता प्लॅस्टिक बंदीमुळे काही तरी दुसरा उपाय करावा लागेल. आणि मग सावलीत हे पापड वाळवायचे. मग नेहमीप्रमाणे हवाबंद डब्यात भरायचे.

काही फणसाचे गरे तर केशरी रंगाकडे झुकणारेही असतात. फणसाच्या असंख्य जाती आहेत. ढोबळमानाने जास्त रसाळ व फायबर असणारा आणि जास्त मांसल असलेला असे प्रकार आहेत. यातही बऱ्याच पोटजाती आहेत आणि नव्याने विकसितही होत आहेत.

गरे नुसते खाण्यासोबतच सांदण, खीर, केक, आईस्क्रिम, बिस्किटं, केक यातही वापर होतो. गऱ्याचा रस टिकवताही येतो. आठळ्या काढून वाटलेले गरे जाड बुडाच्या भांड्यात घेवून मध्यम आचेवर चांगले परतायचे. त्यातला पाण्याचा अंश पूर्ण काढायचा. घट्ट गोळा तयार होईपर्यंत परतत राहायचं. तपकिरी रंग येतो. हे गोळे बनवून 7-8 महिने हवाबंद डब्यात ठेवता येतात. याचं खीर, सांदण बनवतात किंवा नुसतं खायलाही छान लागतं. पण जरा मेहनतीच काम आहे.

आठळ्या जरा वाळल्या की त्यांची पांढरी साल पटकन निघते. या आठळ्यांच्या चक्क पुरणपोळ्या बनवतात. हडबडलात ना? पण खरचं. चण्याच्या डाळीऐवजी आठळी वापरायची. पांढरी साल काढल्यावर आठळीला लालसर तपकिरी रंगाची साल असते. सुरीने ही साल खरवडायची. आता आठळी शिजवून घ्यायची. मग नेहमीप्रमाणे गूळ घालायचा. हवं तर ओलं खोबरही घालायचं. आणि नेहमीप्रमाणे पूरण करायचं. बाकी आपल्या नेहमीच्या पूरणपोळीप्रमाणेच पीठाच्या लाटीत पूरण भरून पोळी करायची.

तुम्हीही जर फणसवेडे असाल तर तुमचं फणसावरचं प्रेम हे पदार्थ आणखी वाढवतील हे निश्चित.
©साधना तिप्पनाकजे

झी मराठी या वाहिनीवर महाराष्ट्राची किचन क्वीन ही स्पर्धा गेले एक महिना सुरू होती या स्पर्धेत आबलोली गावाची सुनबाई सौ सुह...
02/07/2023

झी मराठी या वाहिनीवर महाराष्ट्राची किचन क्वीन ही स्पर्धा गेले एक महिना सुरू होती या स्पर्धेत आबलोली गावाची सुनबाई सौ सुहासिनी शंकर गोणबरे, गाव आबलोली सध्या वास्तव मुंबई यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन महाराष्ट्राची किचन क्वीन मध्ये पहिला क्रमांक पटकावला

 #रानमेवा -लाल केशरी रंगाची धामणं, डोंगरची मैना करवंद,  चाॅकलेटी अळवं आणि रानातली जांभळं, तोरण...आणखी बरंच काही.कोणत्याह...
31/05/2023

#रानमेवा -
लाल केशरी रंगाची धामणं, डोंगरची मैना करवंद, चाॅकलेटी अळवं आणि रानातली जांभळं, तोरण...आणखी बरंच काही.
कोणत्याही नामवंत आंब्याला मागे टाकणारा...बालपणीच्या गोड आठवणींनी भरलेला... रसरशीत रानमेवा खाल्ला नाही तर, उन्हाळा संपला असे वाटत नाही

शुध्द आंबट, आंबट गोड, तुरट गोड, फिकट गोड, मधाळ गोड... अशा आपल्या आहारातून लुप्त होत असलेल्या चवींचा आनंद रानमेवा देतो... मानवी हस्तक्षेप आणि संसर्गापासून दूर जंगलात उगवणारा रानमेवा, हे संपूर्ण सेंद्रिय उत्पादन आहे. म्हणून आरोग्यदायक आहे.... हा रानमेवा विविध जीवनसत्वांचे वरदानही देतो !
मग विचार कसला करताय ?

तुम्ही पण काय खाल्लं आहे ते कमेंट मध्ये सांगा

कोकण आणि सरकारी दरबारी उदासीनता काजू पीक हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातील विषय आहे पण वेंगुर्ला ४ आणि वेंगुर्ला ७ ह्या जा...
06/05/2023

कोकण आणि सरकारी दरबारी उदासीनता

काजू पीक हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातील विषय आहे पण वेंगुर्ला ४ आणि वेंगुर्ला ७ ह्या जाती खूप आधी निर्माण केल्या आहेत पण त्या नंतर काजू वर काहीच संशोधन किंवा काम विद्यापीठाने केलेलं नाही. विद्यापीठाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की काजू झाड म्हणजे वेंगुर्ला ४ किंवा ७, १५ ते १८ किलो काजू बी देतेत पण ही निव्वळ अतिशयोक्ती असून प्रत्यक्षात ६ ते जास्तीत जास्त ८ किलो काजू बी एक झाड देते. १५ ते १८ किलो एक झाड द्यायला लागले तर शेतकरी आर्थिक संपन्न झाला असता पण तसं झालं. म्हणून वारंवार मागणी होऊन देखील काजूची एखादी नवीन जात विद्यापीठाने विकसित केली नाही.

म्हणून वारंवार मागणी होऊन देखील काजूची एखादी नवीन जात विद्यापीठाने विकसित केली नाही. काजू बी सोबत काजू बोंडांवर भक्कम अस काहीच काम केलेलं नाही, त्यावर मॉडर्न मार्केट मध्ये एखादं व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट तयार केलेलं नाही जेणेकरून शेतकरी त्याचा व्यवसाय करू शकतील. तिसरी गोष्ट म्हणजे ओले काजूगर सोलायच्या मशीनची मागणी १४ वर्षांपासून होती पण त्यावर पण संशोधन झालं नाही आणि शेवटी एका शेतकऱ्यानेच स्थानिक पातळीवर त्याची निर्मिती केली. चौथी गोष्ट म्हणजे काजू ला खोडकिड्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे त्यावर संशोधन करावं ही वारंवार विनंती
करून देखील काही उपयोग झाला नाही.

कोकणातील दुसरं अतिमहत्वाचं पीक म्हणजे फळांचा राजा आंबा आणि आंबा जरी जग प्रसिद्ध असला तरी आंब्यावर नैसर्गिक हवामानामुळे इतक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर परिणाम हल्लीच्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला आहे आणि ते रोखण्यासाठी टास्क फोर्स सारख विद्यापीठाने काम करणं अपेक्षित होत पण ते देखील झालेलं नाही. हापूस आंब्याचं पूर्वी दरवर्षी उत्पन्न येत होतं पण आता ते दर दोन किंवा तीन वर्षांनी येत आणि ही खूपगंभीर बाब आहे.

तिसरं फळ म्हणजे फणस, जे जगाच्या मार्केट मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याची मागणी वाढली आहे. फणस हे असं एक फळ आहे ज्याला कोणत्याही खतांची गरज भासत नाही आणि शेतकरी फणस पिकामुळे आर्थिक संपन्न होऊ शकतो. इतक्या वर्षांमध्ये फणस ह्या पिकामध्ये फक्त एकाच (कोंकण प्रॉलिफिक) व्हरायटीच संशोधन केल आहे आणि त्यापासून
होणाऱ्या पदार्थांवर देखील काम केलेले नाही.

चौथ फळ म्हणजे नारळ, केरळ कर्नाटक सारखाच कोंकण हा प्रदेश पण केरळ आणि कर्नाटक मध्ये लाखो हेक्टर वर नारळ लागवड झाली पण कोकणात नाही ह्याच एकच कारण म्हणजे त्याच्या वर आपल्या हवामानानुसार संशोधन झालं नाही आणि जे काही झालं आहे नारळ संशोधन केंद्र भाट्ये येथे, तिथे शेतकऱ्यांना वणवण फिरून बुकिंग करून सुद्धा पाहिजे तितकी नारळ झाड मिळत नाहीत, त्यामुळे नारळ लागवड कमी झाली आहे. कोकणापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात नारळ लागवड वाढत आहे ही आनंदाची बाब जरी असली तरी कोकण च मूळ फळ असून इकडे लागवड का झाली नाही ह्याच कारण विद्यापीठाने अद्याप सांगितलेलं नाही.

कोकम, करवंद, जांभूळ अशी अनेक फळ कोकणात नैसर्गिकरित्या होतात पण विद्यापीठाच्या नाकर्तेपणामुळे हे होऊ शकलं नाही. कोकण कृषी विद्यापीठाच्या गव्हरनिंग बॉडी वर राजकीय हस्तक्षेपामुळे आज देखील विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आहेत, ज्याच्या बदलाची मागणी गेल्या ५ वर्षांपासून होत आहे तरी देखील त्यामध्ये पण उदासीनता आहे

05/05/2023

काल एका महाशयांच्या पोस्टवर वाचलं कि या कोकणातल्या लोकांना विकास नकोय... कोकण सुशेगाद करण्याच्या नादात हॆ कोकणाला अश्मयुगात नेऊन ठेवणार आहेत.
Seriously??? यांचा खोके घरी पोचलेला नेता ज्याला विकास म्हणतोय तोच खरा विकास का???
सागरी पर्यटन, पावसाळी पर्यटन, मासेमारी, हापूस आंबा, फणस, काजू अशा फळबागा जांभळ, करवंद, जाम असा रानमेवा आणि त्यावरील प्रक्रिया उद्योग अशा कितीतरी निसर्गपूरक विकासाच्या संधी असताना रिफायनरी सारखे विनाशकारी प्रकल्प कुणी माथ्यावर आपटत असेल तर कोकणी माणसाने काही न बोलता यालाच विकास म्हणून हॆ सगळं का मान्य करायचं???
शेणाने सारवलेल्या खळ्यात बसून लॅपटॉप वर काम करू शकत नाहीत का मुलं??? कि 10 बाय 10 च्या ac केबिन मध्ये काम केलं कि त्यालाच प्रगती म्हणायची??
फणसाची भाजी, पेज, खाऊन एखादा तरुण दिवसभर गाईड म्हणून काम करायला तयार असेल तर ते अश्मयुग का??? कि बर्गर आणि पिझ्झा मिळायला लागला कि मगच त्याला विकास म्हणायचं.
दिवसभर टुरिस्टना गाडीमधून फिरवून संध्याकाळी झाडाखाली गाडी लावून रात्री भजनाला जाणारा तरुण तुम्हाला अपयशी वाटेल का??? कि त्याला दिवसभर ऑफिसच फ्रस्ट्रेशन काढायला नाक्यावर सिगरेट आणि बियर सहज उपलब्ध झाली कि त्याला आपण आपलं यश म्हणायचं.
घाट उतरून कोकणात उतरलं कि कौलारू घरं, त्या बाजूची परसबाग, हिरवीगच्च झाडी हॆ पाहूनच अर्धा शिणवटा निघून जातो. कोकण केवळ एक प्रांत नसून निसर्गासोबत बहरणारी एक संस्कृती आहे.
कोकणात कुठेही नजर टाकलीत तर नजरेत मावणाऱ्या फ्रेम मध्ये 80% भाग झाडांनी हिरवागार झालेला असतो. त्यांना प्लास्टिकच्या फुलांनी सजलेला फ्लॉवरपॉट देऊन ख़ुश करायचा प्रयत्न करू नका.
निसर्गाला समांतर उभं राहणार नवीन विकासाचं मॉडेल करताना प्रचंड तीव्र इच्छाशक्ती आणि त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याची तयारी हवी.
पण भस्म्या झालेल्या या राजकारणी लोकांना आपल्या हिशाच्या पेट्या पोचल्या कि कशाशी देणंघेणं उरलेल नाही.
आणि या नेत्यांची तळी उचलून धरलेल्यांना आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी काय पेरून ठेवत आहोत याची थोडी सुद्धा कल्पना नाही इतके यांनी स्वतःचे मेंदू गहाण ठेवले आहेत.
आणि यावेळी प्रश्न केवळ कोकणापुरता राहिलाच नाहीय. इतकी मोठी समुद्र किनारपट्टी, सह्याद्री, पश्चिम घाट, यातून वाहणारे वारे, येणारा मान्सून, त्याचे शेती आणि हवामानावर होणारे दुरगामी परिणाम या सगळ्यांची एकत्रितपणे संगती आपण समजून न घेता केवळ विकास का शब्दाचा फास आपण स्वतःभोंवती आवळून घेणार असू तर आम्ही जात्यात असू तर तुम्ही सुपात आहात एवढं विसरू नका.

-सौ.वैभवी रावराणे -पोळ

#विनाशकारी_विकास

02/05/2023

#कोकणी_माणुस_खरोखरच_आळशी_आहे_का?

मी स्वतः कोकणात सिंधुदुर्गात राहतो . रिफायनरीच्या निमित्ताने अनेक फेसबुक तज्ञ कोकणातील माणसे आळशी त्यांना कामधंदा नको , फक्त दोन महिने आंबा धंदा करतात व वर्षेभर बसुन चाकरमान्यांच्या जीवावर जगतात असल्या बोगस गोष्टी लिहिताहेत
कधी कोकणी माणसाने शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय का? ऐकलंत का? एकतरी उदाहरण आहे? कधी रडत बसलेला टिव्ही कॅमेरा समोर रडणारा नुकसान भरपाई द्या कर्जमाफी द्या असं सांगणारा एकतरी कोकणी माणुस शोधुन दाखवा.
महावितरण कडे चौकशी करा कोकणात विद्युत बील थकीत असणारे कोकणी लोकांची टक्केवारी २%तरी आहे का? आकडे टाकुन वीज चोरी करणारा एकतरी कोकणी दाखवा.
आंबा धंदा जरी दोन तीन महिने तरी झाडाखाली वर्षभर मरावे लागते . पावसाळ्यात खत घालावे लागते ,नंतर थंडीत फवारणी,झाडावरील बांधे काढणे बाग सफाई हि कामे आधी आठ महिने असतात तेव्हा तीन महिने उत्पन्न मिळते
भात शेती सुध्दा जुन ते ऑगस्ट सप्टेंबर असली तरी एप्रिल मे मधे जमिनीत पतारा ( तण , पालापाचोळा) जाळणे ,गवत भरणे हा कामे असतात.काजूची मेहनत वर्षभर असते
अनेक गाढवांना कोकणात केवळ आंबे काजू व मासेच मिळतात असे वाटते
कोकणात दुपिकी भातशेती अनेकजण करतात,मोळीचा कांदा ,कुळीथ,चवळी,पावटे वरणे,कडवे वाल अशी अनेक पिके घेतली जातात
वेलची केळी ,नारळ, सुपारी,चिकु, शेवग्याच्या शेंगा,भोपळा,भाजीची केळी ,फणस,जांभळे ,रातांबे ,कोकम ,चिंच अशी अनेक उत्पादने कोकणात घेतली जातात
रिफायनरी करा अथवा करु नका पण कोकणी माणुस हा आळशी नक्की नाही.
ज्यांना वाटत कोकणी माणूस आळशी आहे त्यांना एकदा रातांबे भरायला आमसुले करायला बसवायला हवे ,काजु वेचायला,नारळ उचलुन आणायला, सुपारी सोलायला बसवायला हवे मग कळेल की हि मंडळी आळशी आहेत की मेहनती आहेत
फेसबुक सोशल मिडिया हाताशी आहे म्हणुन वाटेल ते लिहु नका
कोकण रेल्वेत जमिन गेली की त्या बदल्यात नोकरी देणार असे आश्वासन देऊनही अनेकांना नोकरी आजही मिळाली नाही ते लोक आता म्हातारे पण झाली
मुंबई हि पण कोकणात येते मुंबईत तर लाखो उद्योग धंदे आहेत मराठी स्थानिक माणुस आज किती उरलाय तिथे
का उरला नाही?याची चिकित्सा कोणीही करायला तयार नाही
कोकणी माणुस आजही ढोर मेहनत करतोय व आनंदाने भीक न मागता जगतोय .तो आळशी नक्की नाहीये
घरचा देवधर्म, गावातील सण उत्सव,भजन सांभाळतोय
कणसांचे सगळेच दाणे विक्रीला बाजारात जात नसतात तर काही दाणे स्वतः ला मातीत गाडुन घेतात नवीन कणसे यायला कोकणी माणूस हा तसाच आहे.

भूषण दिगंबर जोशी

29/04/2023

कोकण रिफायनरी वरची टीका हि लोकेशन स्पेसिफिक आहे; पण प्रस्थापित प्रवक्ते या अर्ग्युमेंट्सना भिडतच नाहीत ;

कोकणासारख्या इको सेन्सिटिव्ह भागात, निसर्ग सौंदर्यच नाही तर अनेक दुर्मिळ प्रजाती असणाऱ्या प्रदेशात , जेथे अजूनही लाखो कुटुंबे जमिनीशी/ समुद्राशी निगडित उपजीविकांवर जगत आहेत त्या भागात रिफायनरी नको , अशी रिफायनरी समुद्र किनाऱ्यापासून , महाराष्ट्रात (हो आपल्या महाराष्ट्रात !) आत कोठेही असू शकते मध्ये असू शकते

पण या चर्चेत रिफायनरी हि समुद्र किनाऱ्यावरच (“च” वर जोर ) का हवी यावर अनेक अर्ध-अर्थ-साक्षर लोकांनी बरेच तारे तोडले आहेत

याचा अर्थ असा कि रिफायनरी समुद्र किनाऱ्यापासून आतमध्ये हिंटर लँड वर लावताच येणार नाही असे त्यांना सुचवायचे असते वस्तुस्थिती काय आहे ? इतर देशात जाऊद्या , अगदी आपल्या देशातील घरचा आहेर दिला जाऊ शकतो
_____________________________

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. देशाचे अर्धे मार्केट तिच्याकडे आहे

आयओसीची ८० मिलियन्स मेट्रिक टन्स वार्षिक तेल शुद्धीकरण क्षमता आहे ; देशात अनेक ठिकाणी तेलशुद्धीकरण कारखाने आहेत

कोठे ? अनेक ठिकाणी ज्यात बारवांनी, बिहार , मथुरा उत्तरप्रदेश .पानिपत हरयाणा यांचा समावेश आहे ; आणि या राज्यांना समुद्र किनारा नाही ; आय रिपीट या राज्यांना समुद्र किनारा नाही

एकूण १५,००० (पंधरा हजार ) किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन आहेत ज्यामधून क्रूड आणि पेट्रोलियम पदार्थ वाहून नेले जातात

आयओसीचा पानिपत तेलशुद्धीकरण कारखाना बघूया ; आशा आहे पानिपत समुद्र किनाऱ्यावर आहे असे कोणी म्हणणार नाही

अदानीच्या मुंद्रा बंदरात क्रूड येते ; जहाजातून किनाऱ्यावर असणाऱ्या महाकाय टाक्यांमध्ये ते साठवले जाते आणि तेथून मुंद्रा पानिपत हे १२०० किलोमीटर पाईपलाईनमधून तेलशुद्धीकरण कारखान्यात नेले जाते
_____________________

दुसरी पाईपलाईन आहे २६०० किलोमीटरची गुजरात मधील सायला पासून मथुरा तेलशुद्धीकरण कारखान्या पर्यंत

तिसरी आहे ओरिसा मधील पारादीप बंदरापासून पश्चिम बंगालमधील हल्दिया आणि बिहार मधील बारवांनी तेलशुद्धीकरण कारखान्या पर्यन्त

आणि आपला महाराष्ट्र सरळ रेषेत आडवा घातला तर अधिकतम अंतर असेल १००० किलोमीटर

हि आकडेवारी झाली फक्त आयओसी संबंधीत ; भारतातील इतर कंपन्यांची ; इतर देशातील , अगदी विकसित देशातील आकडेवारी काढून सार्वजनिक चर्चांच्या टेबलवर आणली पाहिजे
_____________________________

अजून एक

भारतातील रिफायनरी असे गुगल करा ; पूर्ण यादी मिळेल

ज्या खाजगी क्षेत्रात आहेत त्या सर्व समुद्र किनाऱ्यावर आहेत ; ज्या सार्वजनिक मालकीच्या आहेत त्यांनी समुद्र किनाऱ्यापासून खूप आत रिफायनरी टाकल्या आहेत , कारण हिटर लँड मधील मार्केट केटर करण्यासाठी. मग भले प्रॉफिट मार्जिन्स कमी झाल्या तरी चालतील

एकही खाजगी मालकीची रिफायनरी हिन्टर लँड मध्ये कधीही जाणार नाही ; कारण त्यामुळे पाइपलाइन्स इत्यादींमुळे भांडवली खर्च वाढतॊ आणि ऑपरेटिंग खर्च देखील वाढतो ; त्यामुळे प्रॉफिट मार्जिन्स कमी होतात ; खाजगी कॉर्पोरेट / परकीय भांडवलाला नफ्याची विशिष्ट पातळी अपेक्षित असते ; ती मिळत नसेल तर ते प्रकल्पात हातच घालणार नाहीत

बघा डॉट्स कनेक्ट करून

संजीव चांदोरकर (२८ एप्रिल २०२३)

कोकणातील तालुका गुहागर गाव काजुर्ली मधील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी सोनाली डिंगणकर हिची  #नासा  #इस्रो भेटीसाठी निवड...
24/12/2022

कोकणातील तालुका गुहागर गाव काजुर्ली मधील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी सोनाली डिंगणकर हिची #नासा #इस्रो भेटीसाठी निवड.... !

परंपरा व पीठिकाच्या जाळ्यात अडकलेल्या समाजात एका ग्रामीण ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीची नासा/इस्रो भेटीसाठी निवड हि बाबा नक्कीच अभिमानस्पद आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या "जाणू विज्ञान,अनुभवू विज्ञान" उपक्रमांतर्गत घेण्यात आलेली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची निवड चाचणी परीक्षा ह्या परीक्षेत उत्तुंग यश गुहागर तालुक्यातील काजुर्ली (मानवाडी) गावची सुकन्या व जि.प.शाळा काजुर्ली नं.२ ह्या शाळेची विद्यार्थिनी सोनाली मोहन डिंगणकर हिने प्रथम केंद्र, बिट, तालुका व जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या विविध चाळणी परिक्षांमध्ये यशस्वी ठरली. ठराविक प्रश्न व प्रयोग करणे अशा स्वरूपातील ही परीक्षा होती.यामध्ये अभिमान वाटणारी बाब म्हणजे शेतकरी कुटुंबातील जन्मलेली,कुणबी भूमिपुत्र असणाऱ्या व मुंबईत खाजगी नोकरी करत कौटुंबिक उदरनिर्वाह करणाऱ्या वडिल मोहन डिंगणकर यांची ती कन्या आहे. ह्या परीक्षेत ९ तालुक्यातील विद्यार्थी सहभागी होते. ह्या विद्यार्थ्यांना आपल्या देशाची अंतराळ संशोधन करणारी संस्था इस्रो व अमेरिकेची नासा याठिकाणी भेट देऊन तिथल्या कार्याची माहिती घेता येणार आहे. आता हुशार असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आणि संशोधक वृत्तीला वाव देणे, त्या दृष्टीने ही उचलली जाणारी पाऊले कौतुकास्पद आहेत. सोनालीच्या यशामध्ये तिचे आई-वडील,शाळेतील शिक्षक - दशरथ साळवी (मुख्याध्यापक) सहा.शिक्षिका - पूनम माने व शिक्षक कर्मचारी सुनिल गुडेकर व गावचा पाठींबा यांचं योगदान मोठं आहे. सोनालीचे मनापासून अभिनंदन....!

गुहागर येथील तरूणांसाठी हे विशेष मार्गदर्शन शिबीर.इच्छुकांनी या संधीचा नक्की फायदा करून घ्यावा.  Respected Brother Imran...
30/11/2022

गुहागर येथील तरूणांसाठी हे विशेष मार्गदर्शन शिबीर.
इच्छुकांनी या संधीचा नक्की फायदा करून घ्यावा.
Respected Brother Imran Kondkari Merchant Navy Carrier Guides Program At Guhagar

16/10/2022

महाराष्ट्र ~ राजकारण आणि रस्ते

नुकताच कोकणात जाऊन आलो, आलो परत पुन्हा हे नशीब ,किंवा असं म्हणायला हवं की पानिपतावरून परत आल्यावर जी एक खिन्न भावना असेल त्यावेळी ,कदाचित तीच घेऊन मी हे लिहितोय.
कोकण गोवा हायवे म्हणजे राज्याचं काय मातेरे झालं आहे याचं उत्तम उदाहरण.
हा हायवे केंद्राचा की राज्याचा हा प्रश्न नाहीये आता . चीड आणणारी स्थिती आहे.
या राज्यातील एकूणच यंत्रणेला , रस्ते विकास, लोकांचं आयुष्य,आणि राज्याची प्रगती या विषयी काहीही देणं घेणं उरलेले नाही, याचे या राज्यातील रस्ते हे प्रतीक झाले आहेत.
भयानक निर्ढावलेली राजकीय नेत्यांची मनं, निर्लज्जपणे इतर पोकळ फालतू विषय घेऊन बाईट द्यायची लागलेली सवय, आणि उगीच छत्रपती शिवाजी महाराज वगैरे महापुरुषांची नावं घेऊन ,लोकांना मूर्ख ,नालायक ठरवणारे लोकप्रतिनिधी याला कारणीभूत आहेत.
संताप आणि उद्वेग आहे मनात. लोकांनी, स्थानिकांनी यावर काय करायला हवं आहे नेमकं??
जीवघेणे रस्ते, अपघात , बेताल व्यवस्था यांनी आणि भ्रष्ट ठेकेदारांनी हा महाराष्ट्र लुटून टाकला आहे.
या राज्यातील प्रत्येक पक्षाच्या सुजाण मतदारांनी या बाबत स्वतःला सुद्धा दोषी धरणं गरजेचं आहे.
नेत्यांनो ,
या राज्यातील रस्ते आधी पूर्ण करा, आणि मग इतर महामार्गांची घोषणा करा, तुम्ही नेते झालात याचा अर्थ तुम्ही सरसकट जनतेला मूर्ख समजायचं हे किती काळ सुरू ठेवणार आहात?
मी गोवा हाय वे टाळून नुकताच , 100 पेक्षा जास्त किलोमीटर अधिकचे अंतर घाटावरून यायचे ठरवले तेव्हा, अपेक्षा होती की किमान घाट ते बेंगलोर हायवे रस्ता नीट असेल, पण कुंभार्ली घाट चढल्यावर पाटण पर्यंत अतिशय भीषण असा रस्ता होता. एका स्थानिक आमदाराला हे जमू नये ?? मंत्री, नेते, सम्राट वगैरे आहात नं तुम्ही? तुम्ही मुजोर झाला आहात , जरा भानावर या साहेब.
म्हणजे तुम्ही वाटमारी करताय की जनतेचा रस्त्यात कचाट्यात अडकवून मृत्यू घडवून आणत आहात ?
लोकांनी विचार करावा, आपण कोण आमदार , खासदार निवडून देत आहोत??
मुळात या राज्याचे इतर राज्यांच्या पेक्षा रस्ते वाईट का आहेत ?
हा सर्व टॅक्स पेयर चा पैसा कुठे जातोय??
या राज्यातील, सर्व कार्यसम्राट , दादा, नाना, भाई,ताईसाहेब, अण्णा, भय्या साहेब तुमच्यात सर्वांच्यात जर काही थोडी लाज शिल्लक असेल तर जरा जागे व्हा,त्या एटीम मध्ये पैसा खाऊन मेलेल्या उंदरांसारखी अवस्था होईल तुमची एक दिवस. जरा काही थोडी जनाची नाही तर मनाची लाज राखा , हे राज्य रसातळाला नेण्यासाठी तुम्ही हे रस्ते धुळीला मिळवत आहात ,हे थांबवा.
जरा तुमच्या मोठ्या 25 30 लाखाच्या गाड्या सोडून छोट्या गाड्यांच्या मध्ये बसा, लालपरी बस मध्ये बसा , रिक्षा टमटम मध्ये बसा, वडाप ने जाऊन या,
आणि बघा तुमची काय हालत होईल ती.
तुमची खानदानं ,तुमचे राजकारण चुलीत घालायला ही जनता वेळ लावणार नाही.
महाराष्ट्र खड्यात गेला आहे, रस्ते गायब झाले आहेत, तुमची समृद्धी ही आळवावरचं पाणी आहे ,ती ही जाईल ,तुम्हाला कळणारही नाही साहेब.
मला कोकणच्या जनतेचं विशेष कौतुक वाटतं, जमेल तसे काहीजण फेसबुक असो इतर माध्यमं असोत लिहीत आहेत, पण हे अरण्यरुदन असावं अशी ही स्थिती आहे.
कोकण ते घाटमाथे याला जोडणाऱ्या रस्त्यांची वाताहत आहे, विभागवार कुठेही जा, उत्तर महाराष्ट्र ते विदर्भ जायचे रस्ते, एका महानगरातून दुसरीकडे जायचे रस्ते, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा जायचे रस्ते सगळीकडे हीच परिस्थिती आहे.
हे राज्य असेच चालणार आहे का ?
महाराष्ट्र राज्याचे हे हाल करणं आता थांबवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का नाही ?
एकमेकांची उणी दुणी काढून आणि गलिच्छ राजकारणाची धुणी झाली असतील तर आता ,जरा या राज्याच्या रस्त्यावर नेमकं काय सुरू आहे हे नक्की पाहायला तुमचे दौरे करा.
नाहीतर लवकरच जनता तुमचा कार्यक्रम करेल याची खात्री बाळगा. या राज्यातील स्थानिक आमदार आणि खासदार झोपले आहेत की हरवले आहेत? त्यांना त्यांच्यां मतदारसंघातील रस्ते दिसत, अनुभवत नाहीत का ?
या राज्यातील रस्ते हे राज्याच्या ,लोकांच्या प्रगतीचे खरे आरसे आहेत, जरा तुमचं बधीर बोथट मन जागं करा साहेब.
मंदार फणसे - असो. एडिटर मिरर नाऊ

26/06/2022

गुहागर तालुक्यातील, मासू - भातगाव या रस्त्याचा वाली कोण???

  , पाणी अडवा पाणी जिरवा,मासू भातगाव रस्ताया रस्त्याचा कोणी वाली नाही
20/06/2022

, पाणी अडवा पाणी जिरवा,

मासू भातगाव रस्ता
या रस्त्याचा कोणी वाली नाही

हा तलाव नक्की कुठे आहे कोणी सांगेल का?
19/06/2022

हा तलाव नक्की कुठे आहे कोणी सांगेल का?

15/06/2022

एक योजना रखडलेली, कधी मिळणार गावकऱ्यांना पाणी? पालशेतची योजना 6 वर्षांपासून रखडलेली

28/05/2022

गुहागर :- तालुक्यातील आवरे - भातगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून , वाहने चालविणे जिकिरीचे बनले आहे .
गुहागर आबलोली मार्ग आवरे , असोरे , शिवणे , कोळवली , भातगाव हा रस्ता गेली कित्येक वर्षे दयनीय अवस्थेत आहे . या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालक नाइलाजास्तव शिवणेमार्गे अन्य रस्त्यावरून प्रवास करत आहेत . हा रस्ता अंतर आणि वेळेच्या दृष्टीने गैरसोयीचा आहे . आवरे भातगाव या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत . डांबरीकरण पूर्णतः उखडले आहे . साईडपट्टी खराब झाली आहे . त्याचा त्रास वाहन चालक , प्रवासी , पर्यटक यांना सहन करावा लागत आहे.याच मार्गावर कोळवली हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे .

13/05/2022

*गुहागर* मध्ये जाण्यासाठी काही
खाजगी गाड्यांचे नंबर 🙏📱☎📞🚌
सन - २०२२ ची नविन लिस्ट

●*गुहागर बस डेपो*
02359 240226

●*विरार ते गुहागर मिनी बस*
8275454910, 9422093231

●*श्री दशभुज लक्ष्मी-गणेश ट्रॅव्हल्स*(नरवण ते बोरीवली,विरार)
बस मो.
बोरीवली :- 9757095507
डोडवली :- 9892784369
विरार :- 9869839373
डोडवली :- 9892112569
मुंबई :-
(022):- 28482898,28481807,28962898
नरवण -
(02359)-243711,243811
9594456285,9969422010
तळी :-
9869201440,9869251440

●*श्री महामाई टूर्स अँड ट्रॅव्हल्स
🔴भातगाव,आबलोली ,सायन,दादर, बोरीवली विरार साईनाथ
🔴साईनाथ▪विरार,बोरीवली,सायन,चेंबुर आबलोली,भातगाव

□ विरार :-9689879432/8275623134/9119509372
मुंबई बस मोबाईल नंबर - 07775949432

आबलोली :- 09405209472/8275319423/9767431393
गाव बस मोबाईल नंबर -077219499423

●🌸|| *श्री वक्रतुंड ट्रॅव्हल्स* ||🌸
( विरार/आबलोली/तवसाळ )
*विरार ऑफिस* *आबलोली ऑफिस*
8657400801 8657400803
8657400802 8657400804

मोबाईल नंबर :- 9820924949/9833244949

●*श्री काळभैरव टुर्स अँड ट्रॅव्हल्स*(नरवण ते विरार)
हेदवी- 9404330826/9420690808
विरार- 9822069882/9673901913
तुषार येतोस्कर 7775030808,
8879062157

●*प्रियांका ट्रॅव्हल्स*(नरवण ते बोरीवली)
नरवण :-
(02359)243333,246534,246536
तळी :-
(02359)284033,
9422152527,9765446149
बोरीवली :-
8888489027
9869963418,9969295680
पोळेकर :- 9421854636,9112119027
बस मो. - 9112029927,

●*स्मित ट्रॅव्हल्स*(आबलोली ते विरार)
तळी:-
02359 244449
9420141818, 8805800505, 8888770404
आबलोली:-
02359 245009
9420533636,9423533636, 8888777860
विरार :-
8983393333, 8551853444, 9922336932, 8805808899

●*श्रध्दा टुर्स अँड ट्रॅव्हल्स*
नरवण:-
7083868703,9405042079
मुंबई:-
8652040500

●*ऊँ सोमेश्वर टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स *
( विरार ते तवसाळ )
विरार ऑफिस:-8055670918/9422079181
तळी :- 9420842038
आबलोली :- 9637137727
गाव:-9422800727/8390621727

●*साधना टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स * (विरार ते पाभरे)
शरद :- 9867182580
दिनेश :- 9867898783
आदित्य :- 8286854140
विलास :- 8424838632

●*साई निधी ट्रॅव्हल्स*
नरवण बुकिंग - 8308051036
विरार बुकिंग- 9860646771

●*सुंकाई ट्रॅव्हल्स*
अडुर बुकिंग :- 7507954575,
940433539,
9158725539
मुंबई बुकिंग :- 7039211548, 7218434646, 868997349

●*सुंकाई टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स *
■(नरवण गुहागर चिपळुण ते पुणे-स्वारगेट-पिंपरी-चिंचवड-निगडी)
बुकिंग संपर्क
7770014601
7770014602
7770014603
7770014604
मालक विनायक दनदणे ( अडूर)

●*सुंकाई टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स *
■ नरवण पालशेत,अडुर, गुहागर चिपळुण
■ऐरोली, मुंबई सेंन्ट्रल,कुलाबा
🔴 वेळ सकाळी- गुहागर - ८ वाजता
🔴वेळ सायंकाळी - कुलाबा ९ वाजता

बुकिंग संपर्क
7770014601
7770014602
7770014603
7770014604
मालक विनायक दनदणे ( अडूर)

●*पिंपलेश्वर टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स *
(विरार/अडूर /नरवण )
*मुंबई ऑफिस*
🪀 *7517434646*🪀
🪀 *9075272731*🪀
🪀 *9067941211*🪀
*गाव ऑफिस*
🪀 *9158669691*🪀
🪀 *7218434646*🪀
🪀 *7507954575*🪀

●*झोलाई देवी ट्रॅव्हल्स*
विरार आँफिस - 8237779185, 9075589969, 9503821550

●*प्रशांत ट्रॅव्हल्स*
मो. - 9821252533, 9869809071
टेल- 28975646, 28973414, 28966590
आबलोली-02359-245037, 02359-245038, 9969603902, 9404906171
विरार - 8452830341, 9869820779,
28975646

●ग्लोबल टुर्स अँड ट्रॅव्हल्स
गाव ऑफिस
8012627474 / 8012627575
मुंबई ऑफिस
8108050700 / 8108050900

●*पद्मावती ट्रॅव्हल्स*( विरार ते नरवण/आबलोली )
विरार ऑफीस :- 8655029283/8828663545
मुंबई बस मो :- 8828793545
बोरिवली ऑफीस :- 8655051595/022-28973545
आबलोली आँफिस - 02359-245346, 02359-245052
आबलोली मो.नंबर :-8275440752/8605100752
नरवण आँफिस - 02359-243736, 02359-243468,
नरवण मो.नंबर :- 9420142339/8669564260
मार्गताम्हाणे आँफिस - 02355-270152

●*मंगलमुर्ती टुर्स अँड ट्रॅव्हल्स
(तळवली ते विरार)
तळी :-
8424097040,
8424097041,
8424097042
तळवळी :-
8424097043,
8434097044
विरार :-
8424097045,
8424097046,
8424097047
बस मोबाईल :-
8424097048,
8424097049

कोकणातील शिमगोत्सव.........कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कि...
04/03/2022

कोकणातील शिमगोत्सव.........
कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !

कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात.

कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे . सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी .
त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.

त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा ताडाच्या झाडाची होळी तोडून आणणे .हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. सुमारे 50-70 फूट उंचीचे, 15 वर्षे वयाचे , आणि सुमारे 1200-1500 किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत साहणेवर पालखीसामोर आणून उभे करतात ।

हे सगळे होईपर्यंत सकाळचे 4.00 वाजतात . मग होम केला जातो ,ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट शिल्लक असतो ,तो एक मोठा खड्डा खणून त्यात उभा करतात ,व त्याभोवति गवत रचून मग पालखी प्रदक्षणा होते,आणि मग होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात .तो एक महत्त्वाचा विधी असतो.

होम झाल्यावर रात्रभर दमलेले सगळे गावकरी,चाकरमानी घरी जातात ॰ मग थोडेसे झोपून/आंघोळ -देवपूजा उरकून परत सहाणेवर जमतात .आणि होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून ~गार्‍हाणे ~ नावाचा कार्यक्रम होतो,ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते ,ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.

त्यानंतर तिसर्‍या दिवशी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो ,यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो . तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम देखील पाहण्यासारखा असतो .

त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे-नमन हा लोकनृत्यप्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते.

शिमगा म्हणजे होळी सणाच्या अगोदर १० दिवस छोट्या शेवरीच्या होळ्या जाळण्याची प्रथा आहे . फाल्गुन शुद्ध पंचमी म्हणजेच फाक-पंचमी पासून चतुर्दशी पर्यंत रोज वाडीतील मुले संध्याकाळी होळी उभी करतात ,मग रात्री ११ च्या दरम्याने गवत /लाकडे चोरून आणायची आणि रात्री १ च्या दरम्याने होळी जाळायची ,असा हा कार्यक्रम असतो … यावेळी "डीन्गा पाणी " नावाचा खेळ रात्रीच्या चांदण्यात खेळला जातो, तसेच कोणाची उन्हाळी शेती असेल तर तिथून काकड्या/ कलिंगड आणि आंबे/काजू फणस चोरून आणले जातात आणि ते खाउन मग होळी जाळतात

तर असा आहे कोकणचा शिमगोत्सव ! मंडळी , गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला कोकणात याच !

गुहागर पर्यटनकोकण म्हणजे जणू पृथ्वी वरील स्वर्गच आणि या स्वर्गातील गुहागर हे  कोकणातल्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी ए...
03/02/2022

गुहागर पर्यटन
कोकण म्हणजे जणू पृथ्वी वरील स्वर्गच आणि या स्वर्गातील गुहागर हे कोकणातल्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक. गुहागर तालुक्यातील सुंदर व प्रेक्षणीय पर्यटन ठिकाणांची माहिती एकत्रितपणे पर्यटकांना मिळावी यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे.
गुहागर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. श्री व्याडेश्वराचे प्रसिद्ध मंदिर गुहागर शहरात आहे. गुहागर आपल्या वर्जिन बीच, कॉयर आइटम, नारळ, सुपारी आणि मुख्यत हापुस आंबा यांसाठी प्रसिद्ध आहे.गुहागर ते असगोली असा सुमारे ५ ते ६ कि. मी. लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा गुहागरला लाभला आहे. सुरुच्या बनातून दिसणारा चकाकत्या सोनेरी वाळूचा किनारा, त्यावर धडकणार्‍या शुभ्र फेसाळत्या लाटा, पूर्वेकडे लाभलेली डोंगराची पार्श्वभूमी आणि नारळी-पोफळीच्या बागातून,अथांग निळ्या सागराच्या सान्निध्यात वसलेला गुहागरचा किनारा तितकाच विलोभनीय दिसतो.
ही भगवान परशुरामांची पवित्र भूमी. चिपळूणच्या अलीकडं परशुराम घाट उतरल्यानंतर गुहागरकडं जाणारा मार्ग आहे. या गावात वड आणि पिंपळाचे विशाल वृक्ष पाहता येतात. या परिसरात फिरण्यासारखी अनेक स्थळं आहेत. उफराटा गणपती, श्री व्याडेश्‍वर, गाव-मळण, वेळणेश्‍वर, हेदवी, बामणघळ, रोहिला, तवसाळ आणि गोपाळगड ही त्यापैकीच काही ठिकाणं. दाभोळ ऊर्जा प्रकल्पापासून अंजनवेल सहा किलोमीटरवर आहे आणि तिथून गोपाळगड दोन किलोमीटरवर. गड एकूण सुमारे सात एकरांवर वसवला होता. वेलदूर गावातनं बोटीतनंही या गडावर येता येतं. अंजनवेलला एक दीपगृहदेखील आहे. गुहागर पर्यटन

https://www.youtube.com/watch?v=H2dsQ_BShqk

गुहागर पर्यटनकोकण म्हणजे जणू पृथ्वी वरील स्वर्गच आणि या स्वर्गातील गुहागर हे कोकणातल्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ....

Address

Guhagar
Ratnagiri
415726

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Guhagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Guhagar:

Videos

Share

Nearby travel agencies


Other Tourist Information Centers in Ratnagiri

Show All