The Planet Canopy

The Planet Canopy Welcome to the off beat Centre of tourism. Travel, Heal, Learn & Love!

Kinnaur Valley Sightseeing Tour...19-25 मे 2024 (Ex- Chandhigarh)किन्नौरकडे जाताना...काळ्याकभिन्न आणि रांगड्या सह्याद्री...
07/02/2024

Kinnaur Valley Sightseeing Tour...

19-25 मे 2024 (Ex- Chandhigarh)

किन्नौरकडे जाताना...

काळ्याकभिन्न आणि रांगड्या सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेले आम्ही. त्याच्याच अंगाखांद्यावर खेळत लहानाचे मोठे झालो. त्याच्या राकट पण तितक्याच कणखर हातांनी आम्हाला तोलून धरले गेली कित्येक वर्ष. त्यामुळे सह्याद्रीचे प्रेम खास असलं तरी हिमालयाची शिखरे मात्र सतत खुणावत राहिली. पुस्तकातून वाचलेला, तिथल्या स्थानिकांच्या तोंडातून ऐकलेला हिमालय तिथे जायला लागल्यापासून अधिकाधिक कळत, उमगत गेला.

उत्तरेला भारतीय सीमेची चौकट लंघून पाकिस्तानात काराकोरम रांगामधून पुढे हिंदुकुश पर्वताला जाऊन भिडणारा हा हिमालय भारताला अत्युच्च सौंदर्य प्रदान करतो. चंदीगढ कडून सोलन- शिमला मार्गे किन्नौरकडे जाताना शिवालिक टेकड्या वेगाने मागे सरकत जातात आणि मध्य हिमालयाच्या बर्फाच्छादित पिर पंजाल रांगा दिसू लागतात. खोल तळाशी वाहणारी सतलज, उतारावर सफरचंद आणि चेरीच्या बागा आणि खडे देवदार,ओक तुमच्या पुढील प्रवासाचे सोबती आसतात. माणूस आणि निसर्ग आजही इथे एकोप्याने जगत आहेत याची जाणीव तुम्हाला पुढच्या प्रत्येक क्षणी होत रहाते.

एकाबाजूला खळाळत वाहणाऱ्या सतलजला साक्षी ठेवून अरूंद रस्त्यावरून आपला पुढील प्रवास सुरू होता. किन्नौरचे वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला उंचच उंच पर्वत रांगा आणि दुसऱ्या बाजूला काळजात धस्स होईल इतक्या खोल दऱ्या. अप्पर किन्नौरचा भाग ट्रान्स हिमालयीन श्रेणीत आहे. किन्नौरमध्ये तीन समांतर पर्वतरांगा आहेत. ईशान्येला झंस्कर श्रेणी आहे जी किन्नौरची तिबेटशी असलेली पूर्वेकडील आंतरराष्ट्रीय सीमा आहे. मुख्य ग्रेट हिमालयीन श्रेणी वायव्येकडून दक्षिणेकडे पसरली आहे. तर धौलाधर श्रेणी किन्नौरची दक्षिण सीमा आहे.

अंगवर येणारी किन्नौर कैलाशची शिखरं उशाला घेऊन आपण झोपी जातो. सकाळच्या कोवळ्या प्रकाशात सूर्याची सोनेरी किरणे त्याला सोनसळी अभिषेक घालतात आणि लक्ख पांढरा, तेजस्वी किन्नौर कैलाश सोन्याची प्रभा आलेला, ध्यानाला बसलेला जणू तपस्वी वाटू लागतो. त्यांची उत्युंगता आपला खुजेपणा अजूनच अधोरेखित करत असते.

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर मेसेज किंवा कॉल करा अथवा मेल करा.

90825 52716
theplanetcanopy1gmail.com

30/01/2024

पन्ना राष्ट्रीय उद्यान ( खजुराहो)

Panna National Park with Khajuraho

Batch 1- 11-13 April 2024
Batch 2- 07-09 June 2024

मध्य प्रदेशाच्या उत्तर सीमेला लागून विंध्य रांगेत वसलेले, विस्तृत पठारं आणि घाटांनी वैशिष्ट्यीकृत केलेले मध्य भारतातील शुष्क पानझडी जंगलांपैकीच एक म्हणजे पन्ना. इथल्या जमिनीवर इथले वाघ राज्य करतात तर केन च्या पाण्यावर इथल्या मगरी.

डोंगराळ भाग आणि त्यातून वाहणारी यमुनेची उपनदी केन पन्नाला मध्य भारतातील इतर जंगलांपासून वेगळं करते. इथले क्षणाक्षणाला बदलणारे लँडस्केप कधी कॉर्बेटची, कधी बांधवगडची तर कधी रणथंभोरची आठवण करून देतात. पन्नाचे स्थान भौगोलिक दृष्ट्या खूप खास आहे. इथे अगदी पार दक्षिणेकडून कन्याकुमारी पासून उत्तरेकडे पसरलेल्या जंगल रांगेची एकसंधता संपते आणि याच्यावर उत्तरेला गंगेच्या गाळाचा मैदानी प्रदेश सुरू होतो.

अस्पर्शीत पन्ना बघताना, अनुभवताना वेगळीच मजा आहे.

अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करा

90825 52716

[email protected]

The Planet Canopy wishes you a very Happy New Year!Stop Dreaming, Start Travelling...
01/01/2024

The Planet Canopy wishes you a very Happy New Year!

Stop Dreaming, Start Travelling...

Tadoba – Andhari is Maharashtra’s third, and by far the best, Tiger Reserve, built as part of Project Tiger. The enchant...
15/12/2023

Tadoba – Andhari is Maharashtra’s third, and by far the best, Tiger Reserve, built as part of Project Tiger.

The enchanted land of Taru is a part of Central Deccan Plateau with dense Bamboo and Jamun groves spread out over long hills and open meadows which make perfect habitat for Explore n experience BIG FIVE of Central India. Tiger, Leopard, Wild Dog, Indian Gaur and Sloth Bear.

Reach us out at

+91-90825 52716

Or

Write us: [email protected]

Happy Diwali 🪔🎇
12/11/2023

Happy Diwali 🪔🎇

The Planet Canopy wishes you a very happy and prosperous Diwali 🪔
12/11/2023

The Planet Canopy wishes you a very happy and prosperous Diwali 🪔

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
24/10/2023

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🏵️🌿विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🏵️
24/10/2023

🏵️🌿विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🏵️

Tadoba – Andhari is Maharashtra’s third, and by far the best, Tiger Reserve, built as part of Project Tiger. The enchant...
07/10/2023

Tadoba – Andhari is Maharashtra’s third, and by far the best, Tiger Reserve, built as part of Project Tiger.

The enchanted land of Taru is a part of Central Deccan Plateau with dense Bamboo and Jamun groves spread out over long hills and open meadows which make perfect habitat for Explore n experience BIG FIVE of Central India. Tiger, Leopard, Wild Dog, Indian Gaur and Sloth Bear.

Choose your suitable dates and reach us out.

DM us on 90825 52716

Or

Write us: [email protected]

Explore the Planet with us...DM on 9082552716Or Write us on:theplanetcanopy1@gmail.com
27/09/2023

Explore the Planet with us...

DM on 9082552716

Or

Write us on:

[email protected]

We have successfully completed our Hampi Badami Memorial Tour.Plan your tour with The Planet Canopy to Hampi, A World He...
18/08/2023

We have successfully completed our Hampi Badami Memorial Tour.

Plan your tour with The Planet Canopy to Hampi, A World Heritage Site where the past speaks the language of monuments.

Select your dates and reach us...

For DM/Call:

090825 52716

Or

Write @:

[email protected]

Tadoba – Andhari is Maharashtra’s third, and by far the best, Tiger Reserve, built as part of Project Tiger. Here, you c...
17/08/2023

Tadoba – Andhari is Maharashtra’s third, and by far the best, Tiger Reserve, built as part of Project Tiger. Here, you can explore the serene post monsoon forest, as you see tigers and other mammals in their natural habitat.

The enchanted land of Taru is a part of Central Deccan Plateau with dense Bamboo and Jamun groves spread out over long hills. Explore lush green Tadoba buffer after monsoon with us.

Tadoba National Park (Buffer): 28-30 September 2023

For more details

DM us on 90825 52716

Or

Write us: [email protected]

Panna National Park with Khajuraho: 25-27 November 2023Located in the Vindhya range along the northern border of Madhya ...
09/08/2023

Panna National Park with Khajuraho: 25-27 November 2023

Located in the Vindhya range along the northern border of Madhya Pradesh, Panna is one of the dry deciduous forests in central India characterized by extensive plateaus and ghats.

The hilly terrain and the Yamuna's tributary Ken that flows through it separates Panna from other forests of central India. The ever-changing landscapes sometimes remind of Corbett, Bandhavgarh and Ranthambore. The location of Panna is geographically very special. Just beyond here, the monolith of the forest range starting from Kanyakumari to the north ends, and the gangetic plains begin in the north.

It is a very different experience to see untouched, foggy emerald forest of Panna.

Along with beauty, architecture, history and passion... Of course Khajuraho!

Call us: 90825 52716

Write us: [email protected]

The Planet Canopy

Explore India with The Planet Canopy. Let's go through our fixed departures and block your dates.We also design packages...
28/07/2023

Explore India with The Planet Canopy. Let's go through our fixed departures and block your dates.

We also design packages for your choice dates and choice destinations with real and raw experiences.

For Inquiry DM us on:

090825 52716

Write us @:

[email protected]

Kinnaur Sangla Valley Apple Tour- 01-07 October 2023किन्नौरकडे जाताना...काळ्याकभिन्न आणि रांगड्या सह्याद्रीच्या कुशीत जन...
25/07/2023

Kinnaur Sangla Valley Apple Tour- 01-07 October 2023

किन्नौरकडे जाताना...

काळ्याकभिन्न आणि रांगड्या सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेले आम्ही. त्याच्याच अंगाखांद्यावर खेळत लहानाचे मोठे झालो. त्याच्या राकट पण तितक्याच कणखर हातांनी आम्हाला तोलून धरले गेली कित्येक वर्ष. त्यामुळे सह्याद्रीचे प्रेम खास असलं तरी हिमालयाची शिखरे मात्र सतत खुणावत राहिली. पुस्तकातून वाचलेला, तिथल्या स्थानिकांच्या तोंडातून ऐकलेला हिमालय तिथे जायला लागल्यापासून अधिकाधिक कळत, उमगत गेला.

उत्तरेला भारतीय सीमेची चौकट लंघून पाकिस्तानात काराकोरम रांगामधून पुढे हिंदुकुश पर्वताला जाऊन भिडणारा हा हिमालय भारताला अत्युच्च सौंदर्य प्रदान करतो. चंदीगढ कडून सोलन- शिमला मार्गे किन्नौरकडे जाताना शिवालिक टेकड्या वेगाने मागे सरकत जातात आणि मध्य हिमालयाच्या बर्फाच्छादित पिर पंजाल रांगा दिसू लागतात. खोल तळाशी वाहणारी सतलज, उतारावर सफरचंद आणि चेरीच्या बागा आणि खडे देवदार,ओक तुमच्या पुढील प्रवासाचे सोबती आसतात. माणूस आणि निसर्ग आजही इथे एकोप्याने जगत आहेत याची जाणीव तुम्हाला पुढच्या प्रत्येक क्षणी होत रहाते.

एकाबाजूला खळाळत वाहणाऱ्या सतलजला साक्षी ठेवून अरूंद रस्त्यावरून आपला पुढील प्रवास सुरू होता. किन्नौरचे वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला उंचच उंच पर्वत रांगा आणि दुसऱ्या बाजूला काळजात धस्स होईल इतक्या खोल दऱ्या. अप्पर किन्नौरचा भाग ट्रान्स हिमालयीन श्रेणीत आहे. किन्नौरमध्ये तीन समांतर पर्वतरांगा आहेत. ईशान्येला झंस्कर श्रेणी आहे जी किन्नौरची तिबेटशी असलेली पूर्वेकडील आंतरराष्ट्रीय सीमा आहे. मुख्य ग्रेट हिमालयीन श्रेणी वायव्येकडून दक्षिणेकडे पसरली आहे. तर धौलाधर श्रेणी किन्नौरची दक्षिण सीमा आहे.

अंगवर येणारी किन्नौर कैलाशची शिखरं उशाला घेऊन आपण झोपी जातो. सकाळच्या कोवळ्या प्रकाशात सूर्याची सोनेरी किरणे त्याला सोनसळी अभिषेक घालतात आणि लक्ख पांढरा, तेजस्वी किन्नौर कैलाश सोन्याची प्रभा आलेला, ध्यानाला बसलेला जणू तपस्वी वाटू लागतो. त्यांची उत्युंगता आपला खुजेपणा अजूनच अधोरेखित करत असते.

आपली ऍपल टूर आजच बुक करा. मर्यादित जागा उपलब्ध.

📱7057801575/90825 52716

[email protected]

Hampi-Badami Memorial Tour (12-15 August 2023)कृष्ण देवरायाच्या काळात विजयनगर साम्राज्याच्या लष्करी क्षमताअफगाण आणि मराठ...
19/07/2023

Hampi-Badami Memorial Tour (12-15 August 2023)

कृष्ण देवरायाच्या काळात विजयनगर साम्राज्याच्या लष्करी क्षमता

अफगाण आणि मराठे यांच्यातील पानिपतच्या तिसर्‍या लढाईतील संघर्षाच्या दोन शतकांपूर्वी आणखी एक प्रलयकारी लढाई हिंदू आणि मुस्लिम सैन्यात लढली गेली- "तालिकोटाची लढाई" त्याचे परिणाम खूप भयंकर होते, पानिपतच्या तिन्ही लढायांनी एकत्रितपणे केलेल्या जीवितहानी पेक्षा जास्त जीवितहानी यात झाली. विजयनगर सारखे शक्तिशाली साम्राज्य नष्ट झाले आणि दक्षिण भारतातील हिंदू राजवटीचा अस्त झाला. पण इतिहासातील ही इतकी मोठी घटना थोडी दुर्लक्षितच राहिली.

विजयनगर अगदी त्याच्या नावाप्रमाणेच होते. तीन शतके त्याने कधी पराभव बघितलाच नाही. वाणिज्य, संस्कृती आणि कला यांचे महत्वाचे केंद्र होते. पर्शिया, अरबस्तान ते दूर पूर्वेसोबत त्याचा व्यापार चालत होता. इस्लामिक राजवट उपखंडात आपले पाय पसरत असताना हिंदू संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा बालेकिल्ला म्हणून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. 1520 ते 1560 काळात प्रथम कृष्ण देवराया आणि नंतर राम राजराय यांच्या नेतृत्वाखाली सामर्थ्याच्या शिखरावर पोहोचले होते. त्याने संपूर्ण दक्षिण भारत व्यापून टाकला होता.

बहमनी सुलतानी साम्राज्याशी असलेल्या दीर्घकाळ चाललेल्या शत्रुत्वामुळे विजयनगरला आपली सामरिक शक्ती वाढवण्याची गरज वाटू लागली. 1519 मध्ये श्रीकृष्णदेवराय विजयनगर साम्राज्याचा राजा बनला. त्याने केवळ अंतर्गत राजकारणाचा सामना केला नाही तर गोळकोंडा, विजापूर, बिदर आणि इतर अनेक सुलतान विजयनगर साम्राज्य काबीज करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होते. कृष्णदेवरायाला हे देखील माहित होते की, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, आपल्या साम्राज्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी त्याला सर्वात मजबूत सैन्य तयार करावे लागेल. मोठ्या खड्या सैन्याशिवाय, विजयनगरच्या शासकांनी शक्तिशाली नौदल देखील उभारले. त्यामुळे विजयनगर दक्षिण भारतात उदयास आलेले सर्वात केंद्रीकृत राज्य बनले.

त्याकाळी सैन्यात भरती होण्याची पात्रता म्हणजे बलवान आणि तंदुरुस्त असणे पण कृष्णदेवरायाचा या गोष्टीवर विश्वास नव्हता आणि त्याने हिंमत असलेल्या अनेक तरुणांना सामील केले. युद्धात हत्तींचा वापर आजच्या काळातील वॉर टॅन्कसारखा केला जात असे. परंतु काहीवेळा हत्तींना नियंत्रित करणे कठीण होत असे आणि म्ह्णूनच रायाने लढाईत कोणत्याही क्षणी नियंत्रित करता येऊ शकणार्‍या सर्वात वेगवान घोड्यांची पलटण उभी केली.

अश्वशक्ती (घोडदळ) हे विजयनगरचे शक्तीशाली इंजिन होते ज्याने त्याच्या वाढीला चालना दिली आणि राज्याची सुरक्षा सुनिश्चित केली. तेव्हा घोडदळ असणे ही लष्कराच्या अत्याधुनिकतेचे लक्षण होते. घोडदळामुळे युद्धात मोठा फायदा होत असे. 14व्या आणि 15व्या शतकात घोड्यांच्या व्यापारावर अरबी व्यापार्‍यांची मत्तेदारी होती कारण त्यांचे अरबी समुद्रातील व्यापारी मार्गावर नियंत्रण होते. घोडे जहाजाने पश्चिम किनार्‍या वरील बंदरांवर नेले जात आणि नंतर राजधानीत आणले जात. ही अश्वशक्ती हेच विजयनगरच्या सैन्याने त्यांच्या शत्रूंवर सातत्याने विजय मिळवण्याचे मुख्य कारण होते.

विजयनगरच्या सैन्यात मुख्यतः पायदळ, घोडदळ आणि युद्ध हत्ती, धनुष्यबाण, तलवारी आणि भाले ही प्रमुख शस्त्रे होती. ते प्राण्यांच्या कातडीपासून बनविलेले संरक्षणात्मक कपड्यांचा चिलखतासारखा वापर करत. विजयनगर राजांना बंदुकांमध्ये फारसा रस नसला तरी त्यांच्या पायदळात मॅचलोकमनची रेजिमेंट होती. मध्ययुगीन युद्धात किल्ल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विजयनगर साम्राज्यात आठ प्रकारचे किल्ले होते. किल्ले प्रामुख्याने सीमावर्ती भागात बांधलेले होते.

20% सैन्य हे आलटून पालटून साम्राज्याचे संरक्षण करण्यासाठी वापरले जात असे आणि उर्वरित सेनापती, सैनिक आणि बरेच सैन्य शेतीची कामे करून त्यांच्या कुटुंबाच्या आणि साम्राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत असत. युद्धाच्या कोणत्याही वेळी जवळजवळ सर्व सैनिक, सेनापती आणि अनेक छोटे राजे कृष्णदेवरायाला पाठीशी उभे रहात. युद्धात प्राण गमावलेल्यांचा सन्मान करण्यासाठी तो युद्ध स्मारके बांधत असे आणि त्या कुटुंबांचे आर्थिक भविष्य सुनिश्चित करत असे.

द्वारपालापासून योद्ध्यापर्यंत आणि सेनापतींपासून ते कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत, कृष्णदेवरायाची साम्राज्य चालवण्याची रणनीती आणि युद्धातील डावपेच हे अकल्पनीय होते. त्याने धर्मरक्षणासाठी, राज्यरक्षणासाठी एक दोन नव्हे तर अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्याही.

त्याने आपले आयुष्य केवळ युद्धभूमिवरच घालवले नाही तर राज्याला वैभव दाखवले, आजही जगाच्या विविध भागांतील लाखो पर्यटक आणि इतिहासकार विजयनगर साम्राज्याचा भाग असलेल्या जागतिक वारसा स्थळ हम्पीला भेट देतात. उरलेल्या अवशेषांच्या चष्म्यातून विजयनगरचे सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आजच या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करा. मर्यादित जागा उपलब्ध.

📱90825 52716
[email protected]

13/07/2023

हंपी- इथे इतिहास जिवंत होतो

(Hampi Badami Memorial Trip 12th to 15th August 2023)

तुम्हाला किष्किंधा नगरी पाहायची आहे की विजयनगर?

ज्या देशाला आपला भूगोल माहीत नसतो, त्या देशाचा इतिहास त्याची निर्भत्सना करतो. हंपीचा इतिहास आणि भूगोल दोन्ही वेगळेच. त्रेता युगातली किष्किंधा तेराव्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या रूपाने थाटात उभी होती.

जमिनीखालचा लाव्हा भूगर्भाला भेदून बाहेर येऊन तयार झालेले मोठेले अजस्त्र दगड, सुपीक माळरानं, अखंड वाहणारी तुंगभद्रा आणि म्हणूनच विजयनगर सम्राज्याची राजधानी स्थापण्यासाठी हंपीची निवड केली गेली असावी.

तिथे काय नव्हतं? चार लाखापेक्षा जास्त खडं सैन्य, घोड्यांचे बाजार, हिऱ्या- मोत्यांच्या पेठा, पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या सर्व वस्तू येथल्या बाजारात मिळतात, अशी याची ख्याती होती. आकाशाला भिडणारी गोपूरं, डोळ्याचे पारणे फेडणारे स्थापत्यशास्त्र, अतिशय सुंदर, प्रशस्त रस्ते, भव्य देवळे, धर्मशाळा, किल्ले, प्रचंड मोठे हमामखाने, कालवे, हस्तीशाळा. एकेकाळी या साम्राज्यातून सोन्याचा धूर निघत असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

आणि आता उरलाय तो फक्त तालिकोटच्या पराभवानंतरचा मोठ्ठा पूर्णविराम. हे शहर सतत चार दिवस लुटलं जात होत. कित्येक मंदिरं‌ भ्रष्ट झाली. पण आजही ते दगड विजयनगरच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभे आहेत तेवढ्याच ताकदीने.

बदामीचा प्रत्येक दगड गुलाबी रंगाचा त्यावर केलेले कोरीवकाम तर निव्वळ अप्रतिम. चालुक्यांच्या पराक्रमाची उजळणी इथली शिल्प करतात.कॅमेऱ्यात बंदीस्त करावं असं हे सगळं नाहीच मुळी. त्यांची अनुभूती फक्त 'याची देही याची डोळा' घ्यावी.

आपली जागा आजच नक्की करा, अधिक माहितीसाठी संपर्क करा

📱 090825 52716
[email protected]

मर्यादित जागा उपलब्ध.



Welcome to the off beat Centre of tourism. Travel, Heal, Learn & Love!

Hampi Badami Memorial Tour (12-15 August 2023)  तालिकोटचा पुर्णविराम- विजयनगर हंपीचौदाव्या शतकाच्या अखेरीस सुमारे दिडशे ...
24/06/2023

Hampi Badami Memorial Tour (12-15 August 2023)

तालिकोटचा पुर्णविराम- विजयनगर हंपी

चौदाव्या शतकाच्या अखेरीस सुमारे दिडशे वर्ष टिकलेल्या बहमनी राज्याची सत्ता संपुष्टात आली आणि पाच शाह्यांमध्ये विभागली गेली. महाराष्ट्रात अहमदनगराची निजामशाही, वर्‍हाडातील इमादशाही, बीदर येथील बरीदशाही, विजापुरातील आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही. यातील विजापूर व अहमदनगर या विजयनगरच्या उत्तरसीमेला चिकटून होत्या तर गोवळकोंड्याचा एक चिंचोळा भागही विजयनगरच्या सीमेला लागून होता. या पाच शाह्यांमध्ये सततच्या लढाया होत असत. पण रामराया त्यांच्यातील या दुहीचा फायदा घेऊन स्वबळ वाढवत आहे व लवकरच तो कोणालाही न जुमानता एक एक करून आपल्याला संपवेल याची जाणीव या पाच जणांना झाली असावी आणि याचाच परिणाम म्हणजे तालिकोटची लढाई.

या पाच सत्तांनी एकत्र येऊन विजयनगरवर आक्रमण केले. रामराया शत्रूच्या हाती जिवंत सापडला. शत्रूने ताबडतोब त्याचा शिरच्छेद केला. हिंदूंच्या सैन्याची या प्रकाराने दाणादाण उडाली. त्यांचे मनोध्यैर्य खचले आणि सेना पळत सुटली. पुढे विजयनगर सतत सहा वर्ष लुटले जात होते. मुसलमानांचे सैन्य विजयनगरमधे शिरले आणि त्यांनी लुटालुट करून धुमाकूळ घातला. तशाही परिस्थितीत हे साम्राज्य शंभर वर्षे टिकून होते. शेवटी आपापसातील यादवी आणि मुसलमानी आक्रमणांनी हे साम्राज्य लयास गेले.

परकिय आक्रमणांना टक्कर देत विजयनगरने धर्माचे रक्षण करताना हे हिंदू साम्राज्य फक्त जगवले नाही तर वाढवले, मुसलमानी सत्तेला न जुमानता त्यांच्या छाताडावर पाय देऊन ताठ मानेने तीन शतके राज्य केले.

एक एक कलाकृतींची निर्मितीही अशी केली, लुट करणारे, भ्रष्ट करणारे हात शेवटी थकले तरी ते पूर्णपणे नष्ट करू शकले नाहीत. जे काळाच्या ओघात जमिनीत गाडले गेले तेच आज विजयनगरचा वैभवशाली इतिहास सांगायला पुन्हा उभे ठाकले आहे. इथली प्रत्येक वास्तू, कलाकृती एकेकाळच्या वैभवाची झालर घेऊन उभी आहे त्याला कित्येक ओरखड्यांची, वेदनांची किनार आहे.

कृष्णदेवरायांच्या काळापर्यंत राष्ट्रवाद आणि देशभक्तीने समाजातील सर्व वर्ग एकत्र होते. देवरायानंतरचे राजे सिंहासन, तात्पुरते फायदे आणि प्रादेशिक राष्ट्रवाद यासाठी गृहयुद्धात गुंतले आणि ही एकसंधता कुठेतरी कमी झाली परिणामी साम्राज्य कमकुवत झाले.

त्यामुळे तालिकोटाची लढाई म्हणजे आपली संस्कृती आणि सभ्यता वाचवण्याचा चिरंतन इशारा आहे. तेव्हा विजयनगर साम्राज्य होते आज आपला देश आहे. जोपर्यंत आपण तालिकोटने शिकवलेले धडे गांभीर्याने घेत नाहीत तोपर्यंत इतिहासाची पुनरावृत्ती कधीही होऊ शकते.

या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये आजच मार्क करा. मर्यादित जागा उपलब्ध.



📱: 90825 52716

Email: [email protected]

Himachal Pradesh is all about a holiday should be. Himalayas dominate most of the sights, Sutlaj & Baspa rivers that soo...
15/06/2023

Himachal Pradesh is all about a holiday should be. Himalayas dominate most of the sights, Sutlaj & Baspa rivers that soothe you, and the colorful monasteries and temples that make you escape the chaos of our minds.

The Planet Canopy is happy to take you to Kinnaur and Sangla Valley Apple Tour. Juicy, crispy, and delicious red and golden Kinnauri Apples and snowclad mountain at the backdrop of Apple Trees make your trip mesmerizing.

🗻🍒🍎🍒🍎🍒🍎🍒🍎🍒🍎🍒🍎🍒🗻

For more details

DM us on: 090825 52716

Or

Write us at: [email protected]

Hampi- Badami Memorial Tour (12th to 15th August 2023)हंपी: साम्राज्याचे अवशेष आणि अवशेषांचे साम्राज्यघड्याळाचे काटे उलट...
27/05/2023

Hampi- Badami Memorial Tour (12th to 15th August 2023)

हंपी: साम्राज्याचे अवशेष आणि अवशेषांचे साम्राज्य

घड्याळाचे काटे उलटे फिरवता येत नसले तरी गतवैभव अनुभवता नक्कीच येते आणि मन अभिमान, खूप काही गमावल्याची वेदना, पराभवाचे दुःख अशा संमिश्र भावनांमध्ये अडकून पडते. आपण जातोय तेराव्या शतकाच्या पूर्वाधात.

गेली कित्येक दशके उत्तरेकडे राज्य करणाऱ्या मुस्लिम राजांनी विस्तारवादी धोरण स्वीकारले आणि दक्षिण भारतातील राजकीय परिस्थितीत नाट्यमय बदल झाले. होयसाळा, पंड्या, काकतीय, यादव यांसारख्या विद्यमान दक्षिण भारतीय राजांना घरघर लागली असतानाच मुस्लिम आणि संगमांनी स्थापन केलेली अनुक्रमे बहमनी आणि विजयनगर ही दोन शक्तिशाली राज्ये उदयाला येत होती.

हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी हरिहरच्या नेतृत्वाखाली विजयनगर राज्याची स्थापना करत तुगंभद्रेच्या दक्षिण तटावर वसलेल्या हंपीला आपल्या राजधानीचे शहर म्हणून निवडले. रामायणातल्या वानरांच्या राजाची, सुग्रीवाची किष्किंधा नगरी ती हीच. सीतेच्या शोधात निघालेल्या प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऋष्यश्रुंग, मातंग, अंजना, माल्यवंत आणि हेमकूट या पाच टेकड्यांच्या कुशीत वसलेली ही हंपी.

बहामनीचा बहामनशाह आणि हरिहर-बुक्क यांच्या राज्यविस्तारासाठी आणि असलेले टिकवण्यासाठी सततच्या लढाया होणे अपरिहार्य होते. १३ व्या शतकात स्थापन झालेल्या विजयनगर साम्राज्याचा प्रवास संगम वंशाकडून पुढे चौदाव्या शतकात साळूव, तुळूव पर्यंत येत पंधराव्या शतकात कृष्णदेवरायापर्यंत झाला आणि विजयनगर खऱ्या अर्थाने भरभराटीला आले. स्थापत्य, सुबत्ता, चित्रकला, ग्रंथसंपदा, सामरिक शक्ति सगळ्याच स्तरांवर विजयनगर वैभवाच्या शिखरावर होते. कृष्णदेवराय इतका पराक्रमी योद्धा होता की त्याच्या वाढत्या ताकदीने इतर राजे त्याला रोखायचं कसं या चिंतेत होते.

पुढे तालिकोटच्या लढाईत जरी विजयनगर साम्राज्याचा अंत झाला असला तरी आजही हंपी तितक्याच ताकदीने सतत तीन शतके मुस्लिम आक्रमणांपासून दक्षिणेला वाचवणाऱ्या या हिंदू साम्राज्याच्या देदीप्यमान यशाची साक्ष देत आहे.

हा आस्मानी सौंदर्याचा नजारा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आजच या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करा. मर्यादित जागा उपलब्ध.

📱90825 52716

[email protected]

Tadoba – Andhari is Maharashtra’s third, and by far the best, Tiger Reserve, built as part of Project Tiger. Here, you c...
23/05/2023

Tadoba – Andhari is Maharashtra’s third, and by far the best, Tiger Reserve, built as part of Project Tiger. Here, you can explore the serene deciduous forests, as you see tigers and other mammals in their natural habitat.

The enchanted land of Taru is a part of Central Deccan Plateau with dense Bamboo and Jamun groves spread out over long hills and open meadows which make perfect habitate for Explore n experience BIG FIVE of Central India. Tiger, Leopard, Wild Dog, Indian Gaur and Sloth Bear.

Get ready for concluding trip of this season.

Tadoba National Park: 24-26 June 2023

For more details

DM us on 90825 52716

Or

Write us: [email protected]

HAMPI 🧡⚪💚Hampi-Badami Memorial Tour ( 12-16 August 2023)The Empire of The Ruins & Ruins of The Empire...Epitome of fierc...
09/05/2023

HAMPI 🧡⚪💚

Hampi-Badami Memorial Tour ( 12-16 August 2023)

The Empire of The Ruins & Ruins of The Empire...

Epitome of fierce and resistance offered by indigenous empires to foreign invaders.

Hapmi is still standing tall with grace.

Do visit the land of eternal heritage WHERE HISTORY COMES ALIVE...

Mark your dates and for more details follow our page.

Write us : [email protected]



Get ready to explore the land of Lama's, Mysteries and Adventure...Spiti Valley Sightseeing Tour...💙🤍💙For more details s...
26/03/2023

Get ready to explore the land of Lama's, Mysteries and Adventure...

Spiti Valley Sightseeing Tour...💙🤍💙

For more details stay tuned...

DM us on: 90825 52716

Or

Write us at: [email protected]

We are ready for this summer to take you in the Central Indian Forests, are you?🌿🍂🌿🍂🌿🍂🌿🍂🌿🍂🌿🍂🌿🍂🌿Experience jungle trails ...
23/03/2023

We are ready for this summer to take you in the Central Indian Forests, are you?

🌿🍂🌿🍂🌿🍂🌿🍂🌿🍂🌿🍂🌿🍂🌿

Experience jungle trails & safaris on the land of mighty tigers 🐅

* Panna National Park: 14-17 April 2023

* Bandhavgarh National Park: 12-14 May 2023

* Tadoba National Park: 26-28 May 2023

For more details

DM us on 90825 52716

Or

Write us: [email protected]

Panna is all about its magical landscapes ❤️We are announcing our second departure to Panna- The Emarald Forest of Centr...
12/03/2023

Panna is all about its magical landscapes ❤️

We are announcing our second departure to Panna- The Emarald Forest of Central India.

Dates: 10-12 June 2023

We are Closing our April dates soon (14-17 April 2023)

DM/Call us on: 90825 52716

Write us: [email protected]

Let the colours fly high....🖤🧡💙💚💛🤍
07/03/2023

Let the colours fly high....🖤🧡💙💚💛🤍

Address

Mumbai
400104

Telephone

+919082552716

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Planet Canopy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Planet Canopy:

Videos

Share


Other Eco Tours in Mumbai

Show All